शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावावर गेलेल्या इसमाचा घेतला वाघाने बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथील पुरुषोत्तम उद्धव मडावी (५२) हे तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, ...

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथील पुरुषोत्तम उद्धव मडावी (५२) हे तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, अचानक त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र.९६ या राखीव जंगलात उघडकीस आली.

पुरुषोत्तम हा चेकआष्टा तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी दोन सहकाऱ्यांसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गेला होता, परंतु पुरुषोत्तम मडावी हा अचानक गायब झाला होता. तो घरी परतलाच नाही. रात्रीला त्याच्या नातेवाइकांसह व गावकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर व जंगल पिंजून काढले. मात्र, शोध लागला नाही. पुन्हा शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता, चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. ९६ या राखीव जंगलात पुरुषोत्तमचा मृतदेहच आढळला. घटनास्थळाच्या अवलोकनावरून पुरुषोत्तम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, सहायक वनसंरक्षक कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर.जी. मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते. मृतकाच्या परिवाराला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मृतकाच्या एका वारसाला नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.