शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सीबीएससी बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : देशातील व जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सियस पार झाले. मात्र, सीबीएससी बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपार सत्रात विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. २६ एप्रिल २०२२ पासून परीक्षा सुरू झाल्या. त्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाहीलाही होत असल्याने बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.पंजाबमधील निवडणुकीची परिस्थिती पाहून सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. यामुळे सीबीएससीने  निर्णय बदलावा, अशी मागणी पालक करीत आहे.

अनेक वर्गखाेल्यांमध्ये पंख्यांचा अभाव जिल्ह्यातील काही शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पंख्यांचा अभाव आहे. कूलर किंवा  खोली थंड ठेवायची व्यवस्था नसताना उन्हात घामाच्या लाटेत विद्यार्थी एकचित्ताने पेपर सोडवू शकणार नाहीत. उष्णतेमुळे विद्यार्थ्यांचा बळी जाऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापनाने सीबीएससी बोर्डकडे पुढील परीक्षेचे पेपर सकाळ सत्रात घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

भर उन्हात उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवावे लागत आहे. मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या परीक्षा सकाळ सत्रात घ्याव्यात.- विनायक काळे, पालक, विसापूर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान असते. काही वर्गखोल्यांमध्ये कूलर किंवा इतर तत्सम साधनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी एकाग्रतेने परीक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या गुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो.- प्राचार्य नरेंद्र बोबडे, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन 

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा