शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएससी बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : देशातील व जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सियस पार झाले. मात्र, सीबीएससी बोर्डाने उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यात दुपार सत्रात विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षा घेण्याचा आदेश काढला. २६ एप्रिल २०२२ पासून परीक्षा सुरू झाल्या. त्यामुळे पेपर सोडविताना विद्यार्थ्यांच्या जिवाची लाहीलाही होत असल्याने बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.पंजाबमधील निवडणुकीची परिस्थिती पाहून सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. विदर्भातील उन्हाची दाहकता लक्षात घेऊन सकाळ सत्रात परीक्षा घ्यायला हव्या होत्या. भारतात इतर राज्यांत उष्णता कमी असते. त्यामुळे या दिवसांत तिकडे परीक्षा घेणे सोयीचे आहे; परंतु महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा सगळ्यात उष्ण आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही उष्णतेच्या तीव्र लाटा असल्यामुळे नागरिकांनी भर उन्हात कामाशिवाय बाहेर निघू नये, अशा सूचना केल्या. अशा परिस्थितीत भर उन्हात परीक्षा घेणे सोयीचे आहे का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. यामुळे सीबीएससीने  निर्णय बदलावा, अशी मागणी पालक करीत आहे.

अनेक वर्गखाेल्यांमध्ये पंख्यांचा अभाव जिल्ह्यातील काही शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पंख्यांचा अभाव आहे. कूलर किंवा  खोली थंड ठेवायची व्यवस्था नसताना उन्हात घामाच्या लाटेत विद्यार्थी एकचित्ताने पेपर सोडवू शकणार नाहीत. उष्णतेमुळे विद्यार्थ्यांचा बळी जाऊ नये म्हणून शालेय व्यवस्थापनाने सीबीएससी बोर्डकडे पुढील परीक्षेचे पेपर सकाळ सत्रात घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

भर उन्हात उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये मुलांना परीक्षा केंद्रावर पाठवावे लागत आहे. मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या परीक्षा सकाळ सत्रात घ्याव्यात.- विनायक काळे, पालक, विसापूर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान असते. काही वर्गखोल्यांमध्ये कूलर किंवा इतर तत्सम साधनाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी एकाग्रतेने परीक्षा देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या गुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो.- प्राचार्य नरेंद्र बोबडे, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन 

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा