शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

By admin | Updated: May 11, 2014 00:13 IST

शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून

शंकरपूर : शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून त्याची अफरातफर केली. त्यामुळे डोमा येथील पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून हे गाव पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोमा येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ही योजना अपयशी ठरल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे दोन वर्षाआधी राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ३६ लाख ४ हजार रुपयाची योजना मंजूर करण्यात आली. या बांधकामासाठी पाणीपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व व्यवहाराचे अधिकार या समितीला देण्यात आले. त्यानुसार शासनाकडून प्रथम हप्त्यापोटी १० लाख २७ हजार रुपयांचा धनादेश पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला. सदर रक्कम खर्च करतेवेळी समितीने ग्रामसभा व मासिक सभेमधून खर्चासंबंधी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु समितीने शासनाचे सर्व नियम डावलून प्रथम हप्ता मनमानीपणे खर्च केला. समितीच्या या मनमानी कारभारामुळे कामाची गुणवत्ता बाधित झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन समितीला हिशेब सादर करण्याची नोटीस देण्यात आली. परंतु तत्कालिन समितीने हिशेब ग्रामसभेमध्ये सादर न केल्यामुळे व अगोदरच समितीच्या आर्थिक व्यवहारावर शंका असल्याने ग्रामसभेत एकमताने अविश्वास पारित करण्यात आला आणि समिती बरखास्त करण्यात आली. त्या ग्रामसभेत नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली असून याची माहितीसुद्धा संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानुसार नवीन समितीच्या नावे दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शासनाकडून १५ फेब्रुवारी २०१३ ला दुसरा धनादेश १० लाख २६ हजार रुपये समितीच्या खात्यात पाठविण्यात आला. परंतु नवीन समितीच्या नावे बँक खाते होण्याच्या आधीच जुन्याच समितीने ही रक्कम बँकेतून काढली. नवीन समिती, स्वच्छता समिती किंवा ग्रामपंचायतीला माहिती न करता हा पैसा खर्च करण्यात आला. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या समितीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवीन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे. या नवीन पाणीपुरवठा समिती व जुन्या पाणीपुरवठा समितीच्या वादात ही योजना अडकली असून डोमावासी योजनेअभावी तहानलेलेच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)