शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

By admin | Updated: May 11, 2014 00:13 IST

शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून

शंकरपूर : शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून त्याची अफरातफर केली. त्यामुळे डोमा येथील पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून हे गाव पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोमा येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ही योजना अपयशी ठरल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे दोन वर्षाआधी राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ३६ लाख ४ हजार रुपयाची योजना मंजूर करण्यात आली. या बांधकामासाठी पाणीपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व व्यवहाराचे अधिकार या समितीला देण्यात आले. त्यानुसार शासनाकडून प्रथम हप्त्यापोटी १० लाख २७ हजार रुपयांचा धनादेश पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला. सदर रक्कम खर्च करतेवेळी समितीने ग्रामसभा व मासिक सभेमधून खर्चासंबंधी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु समितीने शासनाचे सर्व नियम डावलून प्रथम हप्ता मनमानीपणे खर्च केला. समितीच्या या मनमानी कारभारामुळे कामाची गुणवत्ता बाधित झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन समितीला हिशेब सादर करण्याची नोटीस देण्यात आली. परंतु तत्कालिन समितीने हिशेब ग्रामसभेमध्ये सादर न केल्यामुळे व अगोदरच समितीच्या आर्थिक व्यवहारावर शंका असल्याने ग्रामसभेत एकमताने अविश्वास पारित करण्यात आला आणि समिती बरखास्त करण्यात आली. त्या ग्रामसभेत नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली असून याची माहितीसुद्धा संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानुसार नवीन समितीच्या नावे दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शासनाकडून १५ फेब्रुवारी २०१३ ला दुसरा धनादेश १० लाख २६ हजार रुपये समितीच्या खात्यात पाठविण्यात आला. परंतु नवीन समितीच्या नावे बँक खाते होण्याच्या आधीच जुन्याच समितीने ही रक्कम बँकेतून काढली. नवीन समिती, स्वच्छता समिती किंवा ग्रामपंचायतीला माहिती न करता हा पैसा खर्च करण्यात आला. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या समितीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवीन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे. या नवीन पाणीपुरवठा समिती व जुन्या पाणीपुरवठा समितीच्या वादात ही योजना अडकली असून डोमावासी योजनेअभावी तहानलेलेच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)