शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पाणीपुरवठा योजनेतील निधीची अफरातफर

By admin | Updated: May 11, 2014 00:13 IST

शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून

शंकरपूर : शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा या गावातील पाणीपुरवठा योजनेतील पैशाची अफरातफर करून परस्पर बँकेतून १ लाख २ हजार ७०० रुपये काढून त्याची अफरातफर केली. त्यामुळे डोमा येथील पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून हे गाव पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोमा येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. परंतु ही योजना अपयशी ठरल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे दोन वर्षाआधी राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ३६ लाख ४ हजार रुपयाची योजना मंजूर करण्यात आली. या बांधकामासाठी पाणीपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व व्यवहाराचे अधिकार या समितीला देण्यात आले. त्यानुसार शासनाकडून प्रथम हप्त्यापोटी १० लाख २७ हजार रुपयांचा धनादेश पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला. सदर रक्कम खर्च करतेवेळी समितीने ग्रामसभा व मासिक सभेमधून खर्चासंबंधी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु समितीने शासनाचे सर्व नियम डावलून प्रथम हप्ता मनमानीपणे खर्च केला. समितीच्या या मनमानी कारभारामुळे कामाची गुणवत्ता बाधित झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन समितीला हिशेब सादर करण्याची नोटीस देण्यात आली. परंतु तत्कालिन समितीने हिशेब ग्रामसभेमध्ये सादर न केल्यामुळे व अगोदरच समितीच्या आर्थिक व्यवहारावर शंका असल्याने ग्रामसभेत एकमताने अविश्वास पारित करण्यात आला आणि समिती बरखास्त करण्यात आली. त्या ग्रामसभेत नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली असून याची माहितीसुद्धा संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानुसार नवीन समितीच्या नावे दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शासनाकडून १५ फेब्रुवारी २०१३ ला दुसरा धनादेश १० लाख २६ हजार रुपये समितीच्या खात्यात पाठविण्यात आला. परंतु नवीन समितीच्या नावे बँक खाते होण्याच्या आधीच जुन्याच समितीने ही रक्कम बँकेतून काढली. नवीन समिती, स्वच्छता समिती किंवा ग्रामपंचायतीला माहिती न करता हा पैसा खर्च करण्यात आला. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून जुन्या समितीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवीन समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे. या नवीन पाणीपुरवठा समिती व जुन्या पाणीपुरवठा समितीच्या वादात ही योजना अडकली असून डोमावासी योजनेअभावी तहानलेलेच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)