शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प लागले मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:02 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : सिंचन क्षमता वाढणार, पाटबंधारे विभागाला कोट्यवधींचा निधी

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडू पाच मोठे बंधारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला.तालुक्यात धानची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंचनाची सोय म्हणुन वाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना उभारण्यात आली. पण या योजनेचे पाणी काही मोजक्याच शेतकºयांनाच मिळतो. त्यामुळे सिंचनाची गंभीर समस्या तालुक्यातील शेतकºयांना सहन करावी लागत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बांधकाम वेगात सुरू आहे. पाटबंधारे विभागाकडून ३५ वर्षांपासून पाणी गळती होत असलेल्या मोलझरी तलावाच्या पाळीचे सिमेंट बांधकाम पुर्ण केले. सदर तलावातील पाणी नागाळा, महादवाडी, गोंडसावरी, फुलझरी येथील शेतकऱ्यांना मिळत आहे. तलावाच्या कामासाठी १ कोटी १३ लाखांचा निधी पाटबंधारे विभागाला देण्यात आला.यामुळे मोलझरी तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ही कामे पूर्ण व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवने, शाखा अभियंता सोनेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यात ५ मोठे बंधारे मंजूर करण्यात आले.यापैकी २ बंधाºयांच्या कामाला सुरूवात झाली. चिरोली येथे १ कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पूल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथ े९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पूल आणि बंधारा बांधण्यासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पूल आणि बंधारा १७ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील चिरोली आणि नलेश्वर येथील बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली. या बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने दुबार पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कॅनल दुरूस्ती करावीवाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना ही जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी पाळ फुटली आहे. त्यासोबतच मुख्य कॅनल नादुरूस्त असल्याने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. कॅनल दुरूस्त झाल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते.