शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प लागले मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:02 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : सिंचन क्षमता वाढणार, पाटबंधारे विभागाला कोट्यवधींचा निधी

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडू पाच मोठे बंधारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला.तालुक्यात धानची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंचनाची सोय म्हणुन वाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना उभारण्यात आली. पण या योजनेचे पाणी काही मोजक्याच शेतकºयांनाच मिळतो. त्यामुळे सिंचनाची गंभीर समस्या तालुक्यातील शेतकºयांना सहन करावी लागत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बांधकाम वेगात सुरू आहे. पाटबंधारे विभागाकडून ३५ वर्षांपासून पाणी गळती होत असलेल्या मोलझरी तलावाच्या पाळीचे सिमेंट बांधकाम पुर्ण केले. सदर तलावातील पाणी नागाळा, महादवाडी, गोंडसावरी, फुलझरी येथील शेतकऱ्यांना मिळत आहे. तलावाच्या कामासाठी १ कोटी १३ लाखांचा निधी पाटबंधारे विभागाला देण्यात आला.यामुळे मोलझरी तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ही कामे पूर्ण व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवने, शाखा अभियंता सोनेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यात ५ मोठे बंधारे मंजूर करण्यात आले.यापैकी २ बंधाºयांच्या कामाला सुरूवात झाली. चिरोली येथे १ कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पूल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथ े९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पूल आणि बंधारा बांधण्यासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पूल आणि बंधारा १७ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील चिरोली आणि नलेश्वर येथील बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली. या बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने दुबार पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कॅनल दुरूस्ती करावीवाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना ही जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी पाळ फुटली आहे. त्यासोबतच मुख्य कॅनल नादुरूस्त असल्याने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. कॅनल दुरूस्त झाल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते.