शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प लागले मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:02 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : सिंचन क्षमता वाढणार, पाटबंधारे विभागाला कोट्यवधींचा निधी

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडू पाच मोठे बंधारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला.तालुक्यात धानची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंचनाची सोय म्हणुन वाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना उभारण्यात आली. पण या योजनेचे पाणी काही मोजक्याच शेतकºयांनाच मिळतो. त्यामुळे सिंचनाची गंभीर समस्या तालुक्यातील शेतकºयांना सहन करावी लागत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बांधकाम वेगात सुरू आहे. पाटबंधारे विभागाकडून ३५ वर्षांपासून पाणी गळती होत असलेल्या मोलझरी तलावाच्या पाळीचे सिमेंट बांधकाम पुर्ण केले. सदर तलावातील पाणी नागाळा, महादवाडी, गोंडसावरी, फुलझरी येथील शेतकऱ्यांना मिळत आहे. तलावाच्या कामासाठी १ कोटी १३ लाखांचा निधी पाटबंधारे विभागाला देण्यात आला.यामुळे मोलझरी तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ही कामे पूर्ण व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवने, शाखा अभियंता सोनेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यात ५ मोठे बंधारे मंजूर करण्यात आले.यापैकी २ बंधाºयांच्या कामाला सुरूवात झाली. चिरोली येथे १ कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पूल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथ े९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पूल आणि बंधारा बांधण्यासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पूल आणि बंधारा १७ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील चिरोली आणि नलेश्वर येथील बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली. या बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने दुबार पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कॅनल दुरूस्ती करावीवाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना ही जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी पाळ फुटली आहे. त्यासोबतच मुख्य कॅनल नादुरूस्त असल्याने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. कॅनल दुरूस्त झाल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते.