शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

चिचाळा व परिसरातील सहा गावांना सिंचन सुविधेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ताडाळा, वेडी रिट आणि गोठणगाव रिठ येथील शेतकऱ्यांच्या शेतीला या योजनेचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीलाही बळ : १३४७ हेक्टर जमीन येणार पाण्याखाली, माजी अर्थमंत्र्यांनी मंजूर केला होता २३ कोटींचा निधी

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून केवळ सहा महिन्यात चिचाळा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षीपासून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याचे काम आता जलदगतीने सुरू झाले आहे.मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग राहतात. विशेषत: शेतीवर अवलंबून आपली उपजिविका करणारे शेतकरी तालुक्यातील चिचाळा परिसरात राहतात. मात्र शेती करण्यासाठी पुरेशा सिंचनाची सोय या परिसरात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी राज्याचे माजी अर्थ नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, मुनगंटीवार यांनीही शेतकऱ्यांच्या या मागणीकडे प्रामुख्याने लक्ष देवून सुमारे २३ कोटी रुपये मंजूर केले होते. या प्रकल्पाचे काम पुणे येथील एन. एन. के. कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामाला सुरूवात केली.अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ताडाळा, वेडी रिट आणि गोठणगाव रिठ येथील शेतकऱ्यांच्या शेतीला या योजनेचा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.सदर योजनेचे काम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, मूल येथील उपविभागीय अभियंता एस. बी. सोनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले आहे. जानेवारी २०१९ रोजी सदर योजनेच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती, आणि केवळ सहा महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करून शेतीला पाणी पुरवठा करण्यात आला. यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.येणाºया रब्बी हंगामात दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरणार आहे.मोलझरी तलावाचीही दुरुस्तीविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत भूमिगत पाईप लाईनच्या माध्यमातून कमी दिवसात काम पुर्ण करून शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था करून देणारी ही योजना विदर्भातील पहिली आहे. असाच प्रयोग सिंधुदुर्ग येथे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र अजून तरी काम पूर्ण झालेले नसल्याचे बोलल्या जाते. चंद्रपूर जिल्ह्यात अपुऱ्या सिंचन व्यवस्थेची बोंब नेहमीच असते. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी मूल तालुक्यात सिंचनावर कामाला सुरूवात केलेली आहे. गेल्या ४० वर्षांपासून पाण्याची गळती असलेल्या मोलझरी तलावाच्या दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आल्याने महादवाडी, नागाळा, फुलझरी येथील शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणात फायदा होत आहे. तालुक्यात बंधाऱ्यांचे बांधकामही जलदगतीने सुरू आहे. करोडो रूपयांचा निधी केवळ सिंचनासाठी मंजूर केला आहे. सदर निधीमधील अनेक कामे प्रत्यक्षात सुरू आहेत. चिचाळा व नजिकच्या सहा गावामध्ये नळजोडणीमार्फत सिंचन सुविधा पुरविण्याचा २३ कोटींवर निधी मंजूर करून शेतीला पाणी पुरवठा केल्याबद्दल चिचाळा व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प