शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:20 IST

सततचा दुष्काळामुळे शेतीशी निगिडत व्यवसायांवरही परिणाम पडला आहे. त्यातच शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउपासमारीची वेळ : पुनर्वसन करून रोजगार देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळामुळे शेतीशी निगिडत व्यवसायांवरही परिणाम पडला आहे. त्यातच शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या अत्यल्प पावसाने शेती हंगाम गेला. खरीप हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारिपटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे ºहासाच्या मार्गावर आहेत. शेती निगिडत अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो.गावोगाव परिभ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुºहाडी, वखर व डवºयाची फास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरु स्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की, दुसºया गावात अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. चंद्रपूर जिल्ह्यात या समाजाची मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून गावागावांतील घटक बनली आहेत. शेतकºयांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्ती करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु सध्या त्यांच्यावर उपासमारिची वेळ आली असून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.शासनाचेही दुर्लक्षदिवसेंदिवस शेतीउद्योग डबघाईस येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोहार बांधवावरही परिणाम पडला आहे. शेतीच्या अवजाराची कामे आता बंद आहेत. पेरणीच्या काळात फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरी करतात यामध्ये उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे शासनाने पुनर्वसन करून रोजगार निर्माण करून देण्याची मागणी लोहार बांधव करीत आहेत.