लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततचा दुष्काळामुळे शेतीशी निगिडत व्यवसायांवरही परिणाम पडला आहे. त्यातच शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या अत्यल्प पावसाने शेती हंगाम गेला. खरीप हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारिपटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे ºहासाच्या मार्गावर आहेत. शेती निगिडत अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो.गावोगाव परिभ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुºहाडी, वखर व डवºयाची फास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरु स्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की, दुसºया गावात अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. चंद्रपूर जिल्ह्यात या समाजाची मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून गावागावांतील घटक बनली आहेत. शेतकºयांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्ती करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु सध्या त्यांच्यावर उपासमारिची वेळ आली असून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.शासनाचेही दुर्लक्षदिवसेंदिवस शेतीउद्योग डबघाईस येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोहार बांधवावरही परिणाम पडला आहे. शेतीच्या अवजाराची कामे आता बंद आहेत. पेरणीच्या काळात फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरी करतात यामध्ये उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे शासनाने पुनर्वसन करून रोजगार निर्माण करून देण्याची मागणी लोहार बांधव करीत आहेत.
यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:20 IST
सततचा दुष्काळामुळे शेतीशी निगिडत व्यवसायांवरही परिणाम पडला आहे. त्यातच शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला
ठळक मुद्देउपासमारीची वेळ : पुनर्वसन करून रोजगार देण्याची मागणी