शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

राज्यात मध्यावधी निवडणूक होणे अटळ

By admin | Updated: November 29, 2014 01:05 IST

राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत.

बल्लारपूर : राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत. मात्र, दुबळे व अधांतरीसरकार कधीही पडून मध्यावधी निवडणूक होऊ शकते. त्यामुळे आपणाला नव्या दमाने आणि विजयी होऊच, या इर्षेने आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे व पुन्ही सत्ता काबीज करायची आहे, असे सांगून यापुढे राज्यात नक्की आपलीच सत्ता येणार, असा ठाम विश्वास विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.आ. वडेट्टीवार हे विधानसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते झालेत त्यानिमित्त त्यांचा बल्लारपूर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. रजनीताई हजारे होत्या. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, कविता खरतड, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, दिलीप माकोडे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आबीद अली, चंद्रपूर महानगरपालिकेचे सभापती रामू तिवारी, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष कमलेश शुक्ला, मेघा भाले, चंद्रपूर न.प. चे गटनेता संतोष लहामगे, शांता बहुरिया, भास्कर माकोडे, हरिश गेडाम, फारूखभाई आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. शाल व श्रीफळ देऊन वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाने आपल्या एक महिन्याच्या शासन काळात जनतेला कसे निराश केले, याची जंत्री वडेट्टीवार यांनी मोठ्या खुबीने मांडली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना, त्यांनी ५४० पत्र विविध मागण्यांसंबंधात दिले होते व त्याकरिता आंदोलनाची भाषा ते बोलत होते. त्या मागण्या पूर्ण करण्याची पाळी आज त्यांच्यावर आली आहे. भाजपा सत्तेवर बसल्यानंतर त्यातील वा इतर कोणतीही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही व करूही शकणार नाही. सत्तेवर नसतांना काहीही बरळता व मागता येते. सत्तेवर आल्यानंतर ते करता येत नाही हे भाजपाच्या नेत्यांना आता कळू लागले आहे. असा टोला त्यांनी मुनगंटीवार यांना मारला. एलबीटी, टोलमुक्ती या सर्व बाबींवर भाजपा आता घुमजाव करीत आहे, याचा विचार लोकांनी करायला हवा आणि या सरकारला जाब विचारायला हवा असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)