शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाव - निमगाव क्षेत्र विकासापासून उपेक्षित

By admin | Updated: June 17, 2016 01:10 IST

अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव,

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आश्वासने दिल्यानंतर त्याची पूर्तता नाहीगेवरा : अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांचे मागील चार वर्षांपासून बिघडलेले अर्थकारण आणि या भागातील लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रति तुटलेली नाळ, या सर्व कारणांंमुळे हे क्षेत्र विकासापासून कायम उपेक्षित आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल या भागातील शेतकरी उपस्थित करू लागला आहे.या जिल्हा परिषद क्षेत्रात दोन पंचायत समिती क्षेत्र असून दोन पक्षाचे पंचायत सदस्य आहेत. निमगाव पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर अंतरगाव - पालेबारसा भाजप आणि जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे. मागील कित्येक वर्षाचा विधान सभेचा राजकीय आलेख बघितल्यास राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच्या विरुध्द पक्षाचे या क्षेत्राचे आमदार असतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समांतर राजकीय व्यासपीठ नाही. तरीही पक्षीय राजकारण करून शेतकऱ्यांना भुरळ घातली जाते. आपल्या पक्ष कार्यात त्यांना ओढून मागे मागे धावत ठेवले आहे. या भागातील स्वत:ला राजकीय कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विसरून राजकीय चष्मा वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे तो दुखणं विसरुन राजकीय गुलाल उधळण्यातच धन्यता मानू लागला. हळूहळू राजकीय सत्तेच्या मोहापोटी या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रश्नांवर काम करण्याचे साधे सौदार्ह दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील राजकर्त्यांची राजकीय प्रतिमा फारशी उजळू शकली नाही. येथील मतदार जनता ओरडू लागली आहे. या भागातील शिक्षण, आरोग्य, सिंचन व्यवस्था, यामुळे शेतकऱ्यांच्या अंंधारलेल्या वाटा आता अधिकच काळोखमय झाल्या आहेत. यावर्षी आसोला मेंढा तलावात गोसेखुर्दचे पाणी अंतरगाव - पालेबारसा या पंचायत समिती क्षेत्रातून मुख्य कालव्याद्वारे सोडण्यात आले. त्याचा फायदा कोणत्याही गावांना झाला नाही. उलट आणेवारीचा परिणाम महसुली परिमंडळामुळे येथील १५ ते १६ गावांना सोसावा लागत आहे. त्याच सोबत निमगाव- विहिरगाव पंचायत समिती क्षेत्रातील सहा गावांना व्याहाड परिमंडळामुळे कायम त्रास सोसावा लागतो. अर्थात पाथरी, राजस्व परिमंडळ आसोला तलाव, व्याहाडच्या लाभ क्षेत्राबाहेरही जि.प. क्षेत्र मोडत असल्याने खऱ्या अर्थाने आतापर्यंत कोणत्याही स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेच्या प्रतिनिधीने या भागातील हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोयरसुतकच लोकप्रतिनिधींना असल्याचे दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीवर आता लक्ष केंद्रीत करुन येणाऱ्या आगामी जि.प., पंचायत समिती निवडणुकांत गुडघ्याला बांशिग बांधून असणारे आणि ज्यांची कारकिर्द आता संपुष्टात येणार आहे, त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची योग्य वेळ येवून ठेपली आहे. विद्यमान आमदारांनी तरी या क्षेत्राकडे गांभीर्याने बघून विकास साधावा, अशी अपेक्षाही जनता व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)