शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

अंतरगाव - निमगाव क्षेत्र विकासापासून उपेक्षित

By admin | Updated: June 17, 2016 01:10 IST

अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव,

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आश्वासने दिल्यानंतर त्याची पूर्तता नाहीगेवरा : अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांचे मागील चार वर्षांपासून बिघडलेले अर्थकारण आणि या भागातील लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रति तुटलेली नाळ, या सर्व कारणांंमुळे हे क्षेत्र विकासापासून कायम उपेक्षित आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल या भागातील शेतकरी उपस्थित करू लागला आहे.या जिल्हा परिषद क्षेत्रात दोन पंचायत समिती क्षेत्र असून दोन पक्षाचे पंचायत सदस्य आहेत. निमगाव पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर अंतरगाव - पालेबारसा भाजप आणि जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे. मागील कित्येक वर्षाचा विधान सभेचा राजकीय आलेख बघितल्यास राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच्या विरुध्द पक्षाचे या क्षेत्राचे आमदार असतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समांतर राजकीय व्यासपीठ नाही. तरीही पक्षीय राजकारण करून शेतकऱ्यांना भुरळ घातली जाते. आपल्या पक्ष कार्यात त्यांना ओढून मागे मागे धावत ठेवले आहे. या भागातील स्वत:ला राजकीय कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विसरून राजकीय चष्मा वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे तो दुखणं विसरुन राजकीय गुलाल उधळण्यातच धन्यता मानू लागला. हळूहळू राजकीय सत्तेच्या मोहापोटी या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रश्नांवर काम करण्याचे साधे सौदार्ह दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील राजकर्त्यांची राजकीय प्रतिमा फारशी उजळू शकली नाही. येथील मतदार जनता ओरडू लागली आहे. या भागातील शिक्षण, आरोग्य, सिंचन व्यवस्था, यामुळे शेतकऱ्यांच्या अंंधारलेल्या वाटा आता अधिकच काळोखमय झाल्या आहेत. यावर्षी आसोला मेंढा तलावात गोसेखुर्दचे पाणी अंतरगाव - पालेबारसा या पंचायत समिती क्षेत्रातून मुख्य कालव्याद्वारे सोडण्यात आले. त्याचा फायदा कोणत्याही गावांना झाला नाही. उलट आणेवारीचा परिणाम महसुली परिमंडळामुळे येथील १५ ते १६ गावांना सोसावा लागत आहे. त्याच सोबत निमगाव- विहिरगाव पंचायत समिती क्षेत्रातील सहा गावांना व्याहाड परिमंडळामुळे कायम त्रास सोसावा लागतो. अर्थात पाथरी, राजस्व परिमंडळ आसोला तलाव, व्याहाडच्या लाभ क्षेत्राबाहेरही जि.प. क्षेत्र मोडत असल्याने खऱ्या अर्थाने आतापर्यंत कोणत्याही स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेच्या प्रतिनिधीने या भागातील हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोयरसुतकच लोकप्रतिनिधींना असल्याचे दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीवर आता लक्ष केंद्रीत करुन येणाऱ्या आगामी जि.प., पंचायत समिती निवडणुकांत गुडघ्याला बांशिग बांधून असणारे आणि ज्यांची कारकिर्द आता संपुष्टात येणार आहे, त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची योग्य वेळ येवून ठेपली आहे. विद्यमान आमदारांनी तरी या क्षेत्राकडे गांभीर्याने बघून विकास साधावा, अशी अपेक्षाही जनता व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)