शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश

By admin | Updated: July 31, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासंबंधीचे भूसंपादन व पूनर्वसनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तत्काळ सादर करावे, ...

आढावा बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावाचंद्रपूर : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासंबंधीचे भूसंपादन व पूनर्वसनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तत्काळ सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सिंचन विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जी. एम. शेख, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, रवींद्र खजांजी, अभियंता राजेश सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील पोथरा नाला प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, बेंडारा मध्यम प्रकल्प, बेंडारा मध्यम प्रकल्प (पूनर्वसन), पळसगांव आमडी उपसा सिंचन योजना, बोरघाट उपसासिंचन योजना, चिचडोह बॅरेज, हरणघाट उपसासिंचन योजना, लाल नाला उपसासिंचन योजना, वाघोलीबुटी उपसासिंचन योजना, सोनापूर टोमटा उपसासिंचन योजना, डोंगरगांव मध्यम प्रकल्प व पकडीगुड्डम प्रकल्प अशा १३ प्रकल्पातील ६५ प्रकरणे भूसंपादन व पूनर्वसनाची असून ६५२.२२ आराजी हेक्टर क्षेत्रफळ आहे.हे सगळे प्रस्ताव १५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येणार असून या कामाचा प्रगती आढावा घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला बैठक घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भूसंपादनाच्या नव्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार असून प्रकल्प क्षेत्रातील रेडीरेकनरचे दर काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. रेडीरेकनरपेक्षा ३ पटीच्यावर मोबदला देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांना अवगत करावे, असे ते म्हणाले. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यापूर्वी किती मोबदला मिळेल याविषयी त्यांना अवगत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून यासाठी कृषी व सिंचन विभागाने संयुक्तरित्या प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. आॅक्टोंबर २०१५ मध्ये धरणात साठलेल्या पाण्यानुसार रब्बीचे नियोजन करण्यात येणार असून कमी पाण्यावर येणारा हरभरा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे कृषी व सिंचन विभागाने सांगितले.(स्थानिक प्रतिनिधी)