शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गोंडपिपरीचा अनुप झाला विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:48 IST

सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देजिद्द, चिकाटी ठरली मोलाची : अथक परिश्रमाने मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे. त्याने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.मुळचा गोंडपिपरी येथील रहिवासी असलेल्या अनुप मुरलीधर भोयर याने १३५ गुण मिळवित विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २५१ विक्रीकर निरीक्षकाच्या पदाकरिता काही दिवसांपुर्वी परीक्षा पार पडली. २ मे रोजी या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अनुपने यश संपादन करीत जो स्पर्धेत टिकेल, तोच यशाला गवसणी घालेल, हे दाखवून दिले.अनुपचे वडील मुरलीधर भोयर हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अनुपचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण गोंडपिपरी येथे झाले. त्यानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे वास्तव्यास राहून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तो पुणे येथे खासगी शिकवणी लावून स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यास करीत असताना त्याने अनेक विभागाची परीक्षा दिली. मात्र अपयशच आले. यानंतरही अनुप खचून गेला नाही. त्याने अभ्यास सुरूच ठेवला आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलाच्या यशाने वडील भारावून गेले असून ही बातमी कानावर पडताच मित्र मंडळीनी फटाके फोडून आनंद साजरा केला.सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असून अनेक जण गाव सोडून शहरातील अभ्यासिकेत तासन्तास अभ्यास करताना दिसतात. मात्र दोन-चार वर्षे अभ्यास करूनही यश न आल्याने काही जण लघु उद्योगाकडे वळले आहेत. मात्र ध्येय गाठण्यासाठी सततचे अपयश पचवून यश मिळविणारच, असा ठाम निश्चय करून अभ्यासात सातत्य ठेवल्याने आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करू शकलो, अशी प्रतिक्रिया अनुप भोयरने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.