शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अ‍ॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देजि.प.चा उपक्रम : जिपीएस प्रणालीद्वारे एकाच ठिकाणी मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अ‍ॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर केली जाते. पावसाळयापूर्वी मार्च ते मे व पावसाळयानंतर आक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत ही पाणी नमुने तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील पाणी स्त्रोत दूषित होऊ नये आणि झालेच तर त्यावर उपाययोजना लवकरात लवकर व्हावी, याकरिता तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना स्वच्छ, शुध्द व शाश्वत पाणी मिळावे, याकरिता शासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केली जाते.यात ही पाणी नमुने तपासणी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील जिल्ह्यात असलेल्या सात प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग मोबाईल अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या मार्फत जिल्हयातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश व रेखांश यांची गाव व ठिकाण अशी अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आलेली आहे. स्त्रोतांची परिपूर्ण माहिती १ आक्टोंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत.पाणी पुरवठा योजना, विहीर, हातपंप तसेच बंद पडलेले स्त्रोत अशा एकूण १४ हजार ९७१ स्त्रोतांबद्दलची माहिती एकाच वेब पोर्टलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील कार्यरत ग्रामसेवक, पंचायत समिती अंतर्गत असणारे समूह समन्वयक व गट समन्वयक, जलसुरक्षक, जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा सल्लागार यांना मोबाईल अ‍ॅप हाताळणीचे प्रशिक्षण जिल्हा पाणी गुणवत्ता कक्षामार्फत देण्यात आले आहे. ग्रामसेवक, जलसुरक्षक किंवा संबधित अधिकारी हे त्या स्त्रोताजवळ जावून मोबाईल अ‍ॅपद्वारे त्याची नोंद करुन पाणी नमुने गोळा करुन ते नजिकच्या प्रयोगशाळेत पोहते करुन देतील.यामुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने दूहित आहेत, कोणते पाणी नमुने पाणी गुणवत्ता पूर्ण आहेत, याची अचुक माहिती या अ‍ॅपमुळे मिळणे सोईस्कर होणार आहे.या मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अघावत माहिती आहे. या अ‍ॅपचा वापर करताना मोबाईल डाटा व जीपीएस प्रणाली सुरु केल्यानंतर स्त्रोतांच्या १० मीटरच्या अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो. त्यानंतर संबधित व्यक्ती त्या स्त्रोतांचे फोटो काढून स्त्रोतात पाणी आहे का, स्त्रोत चालु किंवा बंद आहे, हे अ‍ॅपद्वारे दर्शविता येते. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अघावत होणार आहे.-ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी,(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर.