शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

लग्नापूर्वीच सिकलसेलची तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:01 IST

सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार गहलोत : सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १९ जून जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनाचा कार्यक्रम सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कार्डिले, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिकलसेल आजार नियंत्रणाकरिता जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. बंडू रामटेके, प्रा. हेमंत वरघने आदी उपस्थित होते.डॉ. गहलोत पुढे म्हणाले, सिकलसेल आजार टाळण्यासाठी वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा सिकलसेल तपासणी करण्यास प्रोत्साहित करून या आजाराची माहिती जनसामान्यांना देऊन या आजाराच्या नियंत्रणाकरिता कार्य करण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार यांनी केले. तसेच सिकलसेल रुग्णांकरिता शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान डे-केअर सेंटरचे उद्घाटन तसेच गर्भजल परिक्षण करून आलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डे केअर तंत्रज्ञ अर्चना गावंडे, समुपदेशक भारती तितरे व संस्थेचे पर्यवेक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. संचालन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार तर आभार समुपदेशक शेंदरे यांनी मानले.सिकलसेल आजाराची लक्षणेसिकलसेल रुग्णामध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजार पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी प्यावे, नियमती आहार घ्यावा, नियमित फोलिक अ‍ॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्त्वाचे असते. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजार पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.