शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; प्लॉस्टिकवर केली भाताची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 11:04 IST

सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़

ठळक मुद्देकृषी विभागाने घेतली दखलअपेक्षेनुरूप उत्पन्न मिळाले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़विलास गुरनुले यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन सुधारित पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला होता़ त्यानुसार नवीन तंत्रज्ञान घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर शहर गाठले़ तेथील काही प्रयोगांची पाहणी करून प्लॉस्टिकवर धानाची लागवड करण्याचा निर्णय घेतला़ पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे परहे भरुन रोवणी केली जाते़ परंतु सदर शेतकऱ्याने शेतातील बांधामध्येच प्लास्टिक टाकली. प्लास्टिकला मध्ये छिद्र पाडून धानाची लागवड केली. यामध्ये रावणी करण्याची गरजच राहिली नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे धानामध्ये कचरा उगवला नाही़ कचऱ्याचे प्रमाण अतिशय अल्प होते़ रोवणी व निंदणाचा खर्च कमी झाला़ शिवाय पाणी कमी असतानाही उत्पन्नाची हमी मिळाली़ रासायनिक खताच्या वापराऐवजी गुरनुले यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला़ प्लास्टिकच्या वापरामुळे जमिनीने ओलावा धरुन ठेवला़ यातून गांडुळ खत तयार झाले़ हे खत धानाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरले़ यातून रोपाच्या फूटवे जोमाने वाढले़ ही शेती करण्यासाठी लागवड खर्चही अत्यल्प आला. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माच्या विद्या मानकर, सिंदेवाही येथील भात संशोधन केंद्राचे प्रा़ शेंडे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. बागुल, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी पी. के. मोतीकर आणि कृषी विभागाच्या अन्य अधिकारी तसेच विविध ठिकाणाहून शेकडो शेतकऱ्यांनी गुरनुले यांच्या शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेतली़ विलास गुरनुले यांनी मोहरा धानाचीही लागवड केली़ विशेष म्हणजे, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न झाले़ या नाविण्यपूर्ण प्रयोगाची तालुक्यातील कृषी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :agricultureशेती