शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिंदेवाही तालुक्यात रोहयो मजुरांवर अन्याय

By admin | Updated: October 20, 2014 23:09 IST

रोहयो कायद्यांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने रोपवाटीका तयार करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम करणाऱ्यांना मजुरीच देण्यात आली नाही. तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

चंद्रपूर : रोहयो कायद्यांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने रोपवाटीका तयार करण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काम करणाऱ्यांना मजुरीच देण्यात आली नाही. तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सिंदेवाही तालुक्यातील मजुरांनी केला आहे. रोपवाटिकेच्या कामात पिशव्या भरणाऱ्या मजुरांकडून वेठबिगारी करून घेण्यात आली. पेंढरी(कोके) येथील मजुरांना त्याची नुकसान भरपाई मिळताच सिंदेवाही तालुक्यातील अन्यायग्रस्त मजुरांनी याप्रकरणी प्रशासनाकडे न्याय मागितला. मात्र, तहसीलदार व बिडीओ यांनी या प्रकरणाची चौकशी न करता केवळ वेळ मारून नेली. याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक स्मरणपत्रानंतरही चौकश्ी अधिकारी दखल घेत नसल्याने मजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सिंदेवाहीचे तत्कालीन तहसीलदार व बीडीओ यांच्या विरुद्ध जितेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे २९ मे रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे सोपवली. मात्र ही दोन्ही अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यात दिरंगाई केली आहे, असे मजुरांनी म्हटले आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आजपर्यंत तीन वेळा स्मरणपत्रे देवून चौकशी अहवाल सादर करण्याचे कळविले.मात्र दोन्ही अधिकारी मजुरांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अखिल भारतीय मानवता पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)