शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

मोबदल्यासाठी महापारेषण कंपनी घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:04 IST

महापारेषण कंपनीकडून वीज पुरवठा करून घेण्यासाठी रेल्वे विभाग आणि खासगी कंपन्यांनी मागणी केली होती. या मागणीला उर्जा विभागाने मान्यता दिली असून विद्युत अधिनियम अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिन्या उभारताना तातडीने मदत मिळावी, यासाठी महापारेषण कंपनी पुढाकार घेणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : वाहिनी उभारण्याचा मार्ग सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महापारेषण कंपनीकडून वीज पुरवठा करून घेण्यासाठी रेल्वे विभाग आणि खासगी कंपन्यांनी मागणी केली होती. या मागणीला उर्जा विभागाने मान्यता दिली असून विद्युत अधिनियम अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिन्या उभारताना तातडीने मदत मिळावी, यासाठी महापारेषण कंपनी पुढाकार घेणार आहे. यापूर्वी वीज विकत घेणाऱ्या कंपनीवरच जमीन मालकांना मदतीसाठी अवलंबून राहावे लागत होते.महापारेषण कंपनीने जिल्ह्यातील पाच ठिकाणी विद्युत वाहिण्या उभारण्यास मंजुरी दिली आहे़ वीज वाहिन्यांचे संचलन व सूव्यवस्था करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीची आहे. खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात वीज पारेषणकडून विकत घेतात. वीज वाहिन्या कार्यान्वित करण्यापूर्वी संबंधित जागेचा मोबदला शेतकºयांना मिळावा, यासाठी विद्युत अधिनियम २००३ कलम ६८ चा यावेळी आधार घेण्यात आला आहे़वीज वाहिनी उभारून संबंधित कंपनीला वीज पुरवठा करण्यासाठी महापारेषण कंपनीने काही अटी पुढे ठेवल्या आहेत. त्यामध्ये शेतजमिनीचा मोबदला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जिल्ह्यामध्ये महापारेषण कंपनीने पाच प्रकल्प मंजूर केले आहेत़ त्यामध्ये नागभीड वीज उपकेंद्र तसेच आसगाव-ब्रह्मपुरी मार्गाने लिलो पद्धतीची वाहिनी २१ किमी अंतरावर टाकण्यात येणार आहे. याशिवाय १३२ केव्ही उपकेंद्र दुहेरी सर्किट स्ट्रींगींग करण्यासाठी २७ किमी अंतरावर वीज वाहिनी टाकली जाणार आहे़ या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन घ्यावी लागणार आहे. मात्र आर्थिक मोबदला देताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापारेषण कंपनीने स्वत:कडे मुख्य जबाबदारी ठेवली. जीएमआर एनर्जीसाठी दुहेरी परिपथ वाहिनी १२ किमी अंतरावर टाकण्यास मंजुरी देण्यात आली. याकरिताही जमीन लागणार आहे.खासगी कंपनीला जमीन देताना मोबदल्याचा प्रश्न अडचणीचा ठरत होता़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती़ नव्या नियमानुसार संबंधित कंपनी मोबदला देण्यास दुर्लक्ष करत असेल तर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी आता महापारेषण कंपनीने स्व:तहून घेतली आहे. महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी शेतकºयांची जमीन अधिगृहीत करू शकते़ शासनाच्या नियमाप्रमाणे मोबदला देणे बंधनकारक आहे. यापूर्वी खासगी कंपनीला वीज वाहिन्या टाकून दिल्यानंतर शेतकºयांना जमिनीचा मोबदला मिळण्यास बराच विलंब व्हायचा़ या घटना टाळण्यासाठी महापारेषणने विशेष लक्ष घालण्याचे धोरण तयार केले आहे.