शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त सहा शेतकऱ्यांना ठरविले अपात्र

By admin | Updated: July 28, 2015 02:12 IST

दरवर्षीची दुष्काळी परिस्थती, सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत

गतवर्षी जिल्ह्यात ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : १८ प्रकरणात मदत तर ६ प्रलंबितचचंद्रपूर : दरवर्षीची दुष्काळी परिस्थती, सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. २०१४ या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मात्र यापैकी ६ जणांच्या मदतीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवून दुसऱ्या सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी प्रशासनाकडे हेलपाट्या माराव्या लागत आहे. २०१४ या एका वर्षांत १ जानेवारी ते २४ जुलै या काळात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील १८ शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी १ लाख असे १८ लाख रूपये वितरीत करण्यात आले आहे. मात्र सहा शेतकऱ्यांचे मदत प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून दुसऱ्या सहा शेतकऱ्यांचे प्रस्तावच मात्र नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी प्रशासनाच्या सतत हेलपाट्या माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. सिंचन सुविधा, आर्थिक मदतीचे पॅकेज, कर्जमाफी अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मात्र यानंतरही गत काही वर्षांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा कमी झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. समाजाची मानसिकता व सरकारी कायदेही अप्रत्यक्ष शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. सरकारने शेतकऱ्यांसाठी जे कायदे केले त्याचे मात्र पायच मुळात कमकुवत आहे. त्यामुळे ज्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. परिणामी शेतकरी त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनस्तरावर मंजूर झालेला निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू केले. मात्र अद्याप तरी यश आलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रशिक्षणवर्ग घेऊन केवळ शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, हा संदेश दिल्याने आत्महत्या थांबणार नसून यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेकत्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नाकारलेल्या प्रस्तावांचीफेरचौकशी नाहीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे येते तेव्हा तो प्रस्ताव अपात्र, पात्र ठरविण्यासाठी समितीद्वारे चर्चा होते. मात्र जे प्रस्ताव अपात्र ठरविले जातात त्या प्रकरणाची फेरचौकशी होणे आवश्यक आहे. मात्र प्रलंबित ६ व अपात्र ठरविलेल्या ६ अशा १२ प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावाची फेरचौकशी झालेली नाही.कर्जाचा डोंगर वाढलाकाँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षापासून कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर आहे. नापिकी व दुष्काळामुळे उत्पन्नात घट होत असल्याने कर्ज फेडायचे कसे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी आत्महत्या वाढल्या आहेत. शासकीय निकष किचकट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यामुळे निकषात न बसणारी घटना आत्महत्या म्हणून गणली जात नाही. त्यामुळे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबाला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.मदतीसाठी कुटुंबाचा टाहोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत कुटुंब आहेत.