शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीबाबत राजकीय नेत्यांचीच उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी, : मागील ३५ ते ४० वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी तथा तालुक्यातील ...

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी, : मागील ३५ ते ४० वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी तथा तालुक्यातील जनतेने प्रशासनाकडे लावून धरली; मात्र आजतागायत जिल्हा निर्मिती करण्यात आली नाही. विदर्भवाद्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तर ही मागणी करणाऱ्या तसेच सत्तेतील राजकारण्यांचे जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर ब्रह्मपुरी तालुका असून तालुक्याचा परीघ फार मोठा आहे. शासकीय कामानिमित्त चंद्रपूर गाठावे लागते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विद्येचे माहेरघर, वैद्यकीय सुविधा असलेले शहर म्हणून ब्रह्मपुरीची महाराष्ट्रात ओळख आहे. वैनगंगा नदीने चारही बाजूने वेढले असल्याने येथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नेहमीच करण्यात आली.

वेगळा विदर्भ करण्यासह ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी लावून धरली होती. सन १९८२ ला ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती होणार म्हणून आकाशवाणीवर जाहीर करण्यात आले; मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात येत आहे; परंतु जिल्हा निर्मितीच्या विषयावर अनेकांनी केवळ राजकारण केल्याचे दिसून येते.

ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील जिल्हा निर्मितीच्या जनसामान्यांच्या भावना त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेला नेहमी चंद्रपूर गाठून आपले शासकीय काम करावे लागते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा विषय विधिमंडळात मांडावा व ठराव पारीत करून जिल्हा निर्मिती करावी, अशी अपेक्षा व मागणी जनसामान्य करीत आहेत.

कोट

उपजिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे देण्यात आले. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे कार्यालय नगभीड किंवा ब्रह्मपुरी येथेच व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेव्हा कधी जिल्हा निर्मितीचा विषय शासन स्तरावर मांडला जाईल. तेव्हा ब्रह्मपुरी सर्व दृष्टीने योग्य असल्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करण्यात यावा.

- ॲड. गोविंदराव भेंडारकर

बॉक्स

ब्रह्मपुरीतील विकासकामांची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे

मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. ब्रह्मपुरी मुख्य महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. ब्रह्मपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवी इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ही विकासकामे जिल्हा निर्मिती हेच धेय ठेवून करण्यात येत असल्याचे दिसून येते.