शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीबाबत राजकीय नेत्यांचीच उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी, : मागील ३५ ते ४० वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी तथा तालुक्यातील ...

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी, : मागील ३५ ते ४० वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी तथा तालुक्यातील जनतेने प्रशासनाकडे लावून धरली; मात्र आजतागायत जिल्हा निर्मिती करण्यात आली नाही. विदर्भवाद्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तर ही मागणी करणाऱ्या तसेच सत्तेतील राजकारण्यांचे जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर ब्रह्मपुरी तालुका असून तालुक्याचा परीघ फार मोठा आहे. शासकीय कामानिमित्त चंद्रपूर गाठावे लागते. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विद्येचे माहेरघर, वैद्यकीय सुविधा असलेले शहर म्हणून ब्रह्मपुरीची महाराष्ट्रात ओळख आहे. वैनगंगा नदीने चारही बाजूने वेढले असल्याने येथील जमीन सुपीक आहे. त्यामुळे जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नेहमीच करण्यात आली.

वेगळा विदर्भ करण्यासह ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी लावून धरली होती. सन १९८२ ला ब्रह्मपुरी जिल्ह्याची निर्मिती होणार म्हणून आकाशवाणीवर जाहीर करण्यात आले; मात्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात येत आहे; परंतु जिल्हा निर्मितीच्या विषयावर अनेकांनी केवळ राजकारण केल्याचे दिसून येते.

ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील जिल्हा निर्मितीच्या जनसामान्यांच्या भावना त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेला नेहमी चंद्रपूर गाठून आपले शासकीय काम करावे लागते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा विषय विधिमंडळात मांडावा व ठराव पारीत करून जिल्हा निर्मिती करावी, अशी अपेक्षा व मागणी जनसामान्य करीत आहेत.

कोट

उपजिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे देण्यात आले. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हे कार्यालय नगभीड किंवा ब्रह्मपुरी येथेच व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेव्हा कधी जिल्हा निर्मितीचा विषय शासन स्तरावर मांडला जाईल. तेव्हा ब्रह्मपुरी सर्व दृष्टीने योग्य असल्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण करण्यात यावा.

- ॲड. गोविंदराव भेंडारकर

बॉक्स

ब्रह्मपुरीतील विकासकामांची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे

मधल्या काळात चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी करण्यात आली होती. ब्रह्मपुरी मुख्य महामार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. ब्रह्मपुरी येथे नव्याने १०० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, नगर परिषदेची नवी इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ही विकासकामे जिल्हा निर्मिती हेच धेय ठेवून करण्यात येत असल्याचे दिसून येते.