शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळेच भारत एकसंघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:30 IST

देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत. आज कायद्यावर वादविवाद होणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचे शिक्षण पुस्तकी न होता त्याला व्यावहारिकतेची जोड असायला हवी. भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी रिसर्च असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा तसेच एकदिवसीय राज्यस्तरीय एपीआय मार्गदर्शक कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार विजय भदे, आदिवासी नेते एल. के. मडावी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दिक्षीत, राजेश सोनोने, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, अविनाश जाधव, डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. निरज नगराळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विद्यापीठातील सिनेट सदस्य, बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य, आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक व विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विद्याधर बन्सोडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले.