शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

संविधानामुळेच भारत एकसंघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:30 IST

देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशाच्या प्रगतीसाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे. मात्र सद्यास्थितीत त्यावरच राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. नवी पिढी नवे विचार आत्मसात करीत आहे. त्यामुळे एक विशिष्ट विचारधारा असलेला समूह सतत समाजाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने विद्यार्थी दिशाहीन होत आहेत. आज कायद्यावर वादविवाद होणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचे शिक्षण पुस्तकी न होता त्याला व्यावहारिकतेची जोड असायला हवी. भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ राहणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी रिसर्च असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धीजीवी कर्मचारी संवाद मेळावा तसेच एकदिवसीय राज्यस्तरीय एपीआय मार्गदर्शक कार्यक्रम सरदार पटेल महाविद्यालयाच्या शांताराम पोटदुखे सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार विजय भदे, आदिवासी नेते एल. के. मडावी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दिक्षीत, राजेश सोनोने, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, अविनाश जाधव, डॉ. प्रमोद शंभरकर, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. निरज नगराळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विद्यापीठातील सिनेट सदस्य, बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य, आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक व विशेष प्राविण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विद्याधर बन्सोडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले.