शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

भारत निर्माण योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.

बेंबाळ : भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांत सन २००८ मध्ये उभारण्यात आलेले पाण्याच्या टाक्या अजूनपर्यंत पाण्याविना डौलाने उभ्या आहेत. कोणत्याही प्रकारची पाईपलाईन त्यांना जोडण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा करण्यासाठी जी कामे हाती घेण्यात आली, ती सात वर्षे उलटूनही पूर्णत्वास गेलेली नाही. या टाक्या उभारण्याकरिता लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजना ही सन २००८ मध्ये संतोषसिंग रावत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अंमलात आणण्यात आली. तत्कालिन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालिन उपअभियंता मडावी यांच्या प्रयत्नातून ही योजना साकार झाली आहे. मात्र या योजनेकडे आजही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कित्येक गावात पाण्याची टंचाई व त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ बसणार आहे. हा विषय निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)