शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भारत निर्माण योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.

बेंबाळ : भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांत सन २००८ मध्ये उभारण्यात आलेले पाण्याच्या टाक्या अजूनपर्यंत पाण्याविना डौलाने उभ्या आहेत. कोणत्याही प्रकारची पाईपलाईन त्यांना जोडण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा करण्यासाठी जी कामे हाती घेण्यात आली, ती सात वर्षे उलटूनही पूर्णत्वास गेलेली नाही. या टाक्या उभारण्याकरिता लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजना ही सन २००८ मध्ये संतोषसिंग रावत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अंमलात आणण्यात आली. तत्कालिन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालिन उपअभियंता मडावी यांच्या प्रयत्नातून ही योजना साकार झाली आहे. मात्र या योजनेकडे आजही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कित्येक गावात पाण्याची टंचाई व त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ बसणार आहे. हा विषय निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)