शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे वाढले क्षारांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य ...

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य नसेल तर आरोग्य धोक्यात येत असते. असेच काहीसे तालुक्यातील औद्योगिक भागात निदर्शनास येत आहे.

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरातील अनेक ठिकाणी भूजलाच्या साठ्यात क्षारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

सर्वसामान्यपणे शुद्ध पाणी मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. शरीरास थोडेसे क्षार असणारे पाणी आवश्यक असतेच; परंतु पाणी अशुद्ध असेल तर ते आजाराला आमंत्रित करत असते. दरवर्षी एकरी चार टन क्षारांचा भरणा निरनिराळ्या माध्यमातून होत असून, प्रदूषित पाण्याचे संकट वाढतच आहे व स्वच्छ पाण्याचे साठे दूषित होत आहेत. त्यासाठी वेळीच जागृती झाली पाहिजे. औद्योगिक भागासोबतच ग्रामीण भागातसुद्धा परिस्थिती सारखीच होत चालल्याने भविष्यात दूषित पाण्यामुळे पिण्याचा पाण्याची बोंब नक्कीच होणार, यात काही शंका नाही.

पिण्याच्या पाण्यात कार्बोनेट, क्लोराईड, फॉस्फेट, बायकार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट अशा अनेक क्षारांचा भरणा उद्योगातील भागात वाढत असून, त्याचा मानवी व जनावरांच्या किडनीवर परिणाम होताना दिसून येत आहे.

मानवाला पाण्याचा माध्यमातूनच जास्तीत जास्त विकार होत असतात. टायफाॅईड, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ, त्वचा रोग, अस्थिव्यंग, पोटदुखी, मूतखडा, श्वसनाचे, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी पिल्याने होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.