शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे वाढले क्षारांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य ...

आवाळपूर : मानवातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवाला जीवन जगण्याकरिता पाण्याची नितांत आवश्यक असते; परंतु पाणी पिण्यास योग्य नसेल तर आरोग्य धोक्यात येत असते. असेच काहीसे तालुक्यातील औद्योगिक भागात निदर्शनास येत आहे.

उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरातील अनेक ठिकाणी भूजलाच्या साठ्यात क्षारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

सर्वसामान्यपणे शुद्ध पाणी मिळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. शरीरास थोडेसे क्षार असणारे पाणी आवश्यक असतेच; परंतु पाणी अशुद्ध असेल तर ते आजाराला आमंत्रित करत असते. दरवर्षी एकरी चार टन क्षारांचा भरणा निरनिराळ्या माध्यमातून होत असून, प्रदूषित पाण्याचे संकट वाढतच आहे व स्वच्छ पाण्याचे साठे दूषित होत आहेत. त्यासाठी वेळीच जागृती झाली पाहिजे. औद्योगिक भागासोबतच ग्रामीण भागातसुद्धा परिस्थिती सारखीच होत चालल्याने भविष्यात दूषित पाण्यामुळे पिण्याचा पाण्याची बोंब नक्कीच होणार, यात काही शंका नाही.

पिण्याच्या पाण्यात कार्बोनेट, क्लोराईड, फॉस्फेट, बायकार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट अशा अनेक क्षारांचा भरणा उद्योगातील भागात वाढत असून, त्याचा मानवी व जनावरांच्या किडनीवर परिणाम होताना दिसून येत आहे.

मानवाला पाण्याचा माध्यमातूनच जास्तीत जास्त विकार होत असतात. टायफाॅईड, पित्त विकार, कॅन्सर , कावीळ, त्वचा रोग, अस्थिव्यंग, पोटदुखी, मूतखडा, श्वसनाचे, मतिमंदत्वासारखे भयंकर आजार दूषित पाणी पिल्याने होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.