शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सिकलसेल आजाराचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण

चंद्रपूर : जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण या आजाराने बाधित आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.२००९ ते आॅगस्ट २०१४ च्या आकडेवारीनुसार २० हजार ३६० एएस सिकलसेलचे रुग्ण, तर एसएसचे २ हजार १४ रुग्ण आहेत. यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. वाहन व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेलचा आजार देऊ शकतात. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. याला पिडीत व्यक्तीसारखा त्रास होत नाही. मात्र दोन्ही वाहक व्यक्तीने विवाह केला तर त्यापासून जन्माला येणारी संततीला सिकलसेल होऊ शकतो. मागील वर्षात सिकलसेलमुळे ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रक्ततपासणीतून या आजाराचे निदान करता येते. या रुग्णांना आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. हा आजार आनुवंशिक असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिकलसेलविषय अनेक गैरसमज समाजात पसरले आहे. ते दूर होणे गरजेचे आहे. या आजाराविषयीच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातर्फे गावस्तरावर शिबिर घेतली जातात. शिबिरात रक्तचाचणीही होते. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे केली जातात. १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन असतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्यात येतात. जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल रक्त चाचणी करुण घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जर १०० व्यक्तींची रक्तचाचणी केल्यास तीन आजारी व्यक्ती तर १५ वाहक व्यक्ती असू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येकांनी चाचणी करून औषधोपचार सुरु करावा, अशी विनंती करण्यात आली. आहे. (नगर प्रतिनिधी)