शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

सिकलसेल आजाराचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण

चंद्रपूर : जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण या आजाराने बाधित आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.२००९ ते आॅगस्ट २०१४ च्या आकडेवारीनुसार २० हजार ३६० एएस सिकलसेलचे रुग्ण, तर एसएसचे २ हजार १४ रुग्ण आहेत. यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. वाहन व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेलचा आजार देऊ शकतात. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. याला पिडीत व्यक्तीसारखा त्रास होत नाही. मात्र दोन्ही वाहक व्यक्तीने विवाह केला तर त्यापासून जन्माला येणारी संततीला सिकलसेल होऊ शकतो. मागील वर्षात सिकलसेलमुळे ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रक्ततपासणीतून या आजाराचे निदान करता येते. या रुग्णांना आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. हा आजार आनुवंशिक असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिकलसेलविषय अनेक गैरसमज समाजात पसरले आहे. ते दूर होणे गरजेचे आहे. या आजाराविषयीच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातर्फे गावस्तरावर शिबिर घेतली जातात. शिबिरात रक्तचाचणीही होते. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे केली जातात. १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन असतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्यात येतात. जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल रक्त चाचणी करुण घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जर १०० व्यक्तींची रक्तचाचणी केल्यास तीन आजारी व्यक्ती तर १५ वाहक व्यक्ती असू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येकांनी चाचणी करून औषधोपचार सुरु करावा, अशी विनंती करण्यात आली. आहे. (नगर प्रतिनिधी)