शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

पाणी संचय करण्याची गरज चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती ...

पाणी संचय करण्याची गरज

चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी राबविल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

मोबाईल दुरुस्तीसाठी गर्दी

चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोअरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोअरमध्ये अनेक कंपन्यांच्या मोबाईलचेही स्टोअर असल्याने त्या कंपन्यांचे ग्राहकसुद्धा गर्दी करतात. त्यामुळे आणखी एक एमआय स्टोअर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

चंद्रपूर : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांमुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे.

जुनोना रस्त्यावर खड्डे

चंद्रपूर : चंद्रपूर - जुनोना मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून पोंभुर्णा, चिचपल्ली आदी गावांकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

प्लास्टिकचा वापर वाढला

चंद्रपूर : जिल्ह्यात बहुतांश शहरांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: व्यावसायिक ग्राहकांना बिनद्दिकतपणे ग्राहकांना पिशव्या देत आहेत. पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात

चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

चंद्रपूर : बाबूपेठमधील अनेक रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

पाणी पुरवठा सुरळीत करावा

चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.