शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

पाणी संचय करण्याची गरज चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती ...

पाणी संचय करण्याची गरज

चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी राबविल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

मोबाईल दुरुस्तीसाठी गर्दी

चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोअरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोअरमध्ये अनेक कंपन्यांच्या मोबाईलचेही स्टोअर असल्याने त्या कंपन्यांचे ग्राहकसुद्धा गर्दी करतात. त्यामुळे आणखी एक एमआय स्टोअर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

चंद्रपूर : जंगलव्याप्त क्षेत्रात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांमुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे.

जुनोना रस्त्यावर खड्डे

चंद्रपूर : चंद्रपूर - जुनोना मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून पोंभुर्णा, चिचपल्ली आदी गावांकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.

प्लास्टिकचा वापर वाढला

चंद्रपूर : जिल्ह्यात बहुतांश शहरांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. विशेषत: व्यावसायिक ग्राहकांना बिनद्दिकतपणे ग्राहकांना पिशव्या देत आहेत. पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने युज अँड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

ग्रामीण भागातील ऑटो व्यवसाय संकटात

चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

चंद्रपूर : बाबूपेठमधील अनेक रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे. या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

पाणी पुरवठा सुरळीत करावा

चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.

पोलीस पाटलांची पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पोलीस पाटलांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्त पदांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शासनाने ही रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.