शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना विश्वासात न घेता शाळेकडून शुल्कवाढ

By admin | Updated: April 26, 2015 01:46 IST

अलिकडे इंग्रजी शिक्षणाची सगळीकडेच क्रेज निर्माण झाली आहे. चांगल्या शाळेत इंग्रजी शिक्षण घेता यावे, यासाठी पालकांची रांग लागलेली दिसते.

नांदाफाटा : अलिकडे इंग्रजी शिक्षणाची सगळीकडेच क्रेज निर्माण झाली आहे. चांगल्या शाळेत इंग्रजी शिक्षण घेता यावे, यासाठी पालकांची रांग लागलेली दिसते. मात्र काही इंग्रजी शाळा शिक्षणाच्या नावावर पालकांकडून अव्याच्यासव्वा शुल्क आकारत आहेत. अल्ट्राटेक येथील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल या इंग्रजी शाळेत यावर्षी पहिली ते आठवीसाठी २७५० रुपये, नऊवी ते १२ वीसाठी ३००० रुपये प्रति महिना शुल्क ठेवण्यात आले आहे. अचानक झालेल्या शुल्कवाढीमुळे मुलांना इंग्रजी शिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न पालकांपुढे निर्माण झाला आहे. पालकांना विश्वासात न घेताच शैक्षणिक शुल्क वाढविल्याचा आरोप पालक करीत आहे. गेल्या वर्षीही अशीच शुल्कवाढ करण्यात आली होती. प्रति महिना १६२५ रुपये घेण्यात आले. त्यावेळी ३१ जुलै २०१४ ला स्थानिक आमदार, कंपनी व्यवस्थापन, दत्तक गावातील सरपंच यांच्याकडे पालकांनी न्याय मागितला. मात्र शुल्कामधील वाढ जैसे थेच होती. आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाने अधिक शुल्क वाढविल्याने पालक त्रस्त आहेत. या शुल्काव्यतिरिक्त पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य स्वत:च पालकांना खरेदी करून द्यायचे आहे. विशेष म्हणजे, नविन सत्राचे पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. अल्ट्राटेक कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शाळेचे शुल्क अत्यंत कमी आहे. यातच बाहेर गावातील कंत्राटी कामगार, मजूर, शेतकरी यांच्या पाल्यांसाठी अधिकचे शुल्क भरावे लागत आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या पालकांना कुटुंबाचा बोझा वाहताना आता शिक्षणाची चिंता भेडसावत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अनेक बाहेरील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अचानक फी वाढ झाल्याने शिक्षण घेणे कठीण होत आहे. त्याचबरोबर काही पालकांचे दोन- दोन अपत्य या इंग्रजी शाळेत शिकतात. अशा पालकांना दर महिन्यात पाच ते सहा हजार रुपये शैक्षणिक शुल्क भरावे लागत आहे. दुसरीकडे अनेक कामगारांचे महिन्याचे वेतन पाच ते सहा हजार रुपये आहे. सिमेंंट कंपनीने लगतचे नांदा, बिबी, आवारपूर, नोकारी, पालगाव, बाखर्डी हे गाव दत्तक म्हणून घेतले आहे. या गावातील पाणी, आरोग्य, रस्ते आणि शिक्षणावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत असल्याचे दिसत आहे. तसा अहवालही शासनाकडे पाठविला जात आहे. परंतु कंपनी प्रशासन दत्तक गावातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश देऊन आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार आता पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे. शाळेने वाढविलेले शैक्षणिक शुल्क त्वरित कमी करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शशिकांत दिवे यासह अनेक पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)