शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रकल्प शेतकऱ्यांना जमिनीचा मिळणार वाढीव मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:40 IST

७६५, ४४० व २२० केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीच्या तारेखालील शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत जमिनीचा ामोबदला देण्याचे शासनाने ३१ मे २०१७ रोजी परिपत्रक काढल होते. या परिपत्रकात दुरस्ती करण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे केली.

आॅनलाईन लोकमतवरोरा: ७६५, ४४० व २२० केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीच्या तारेखालील शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत जमिनीचा ामोबदला देण्याचे शासनाने ३१ मे २०१७ रोजी परिपत्रक काढल होते. या परिपत्रकात दुरस्ती करण्याची मागणी आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे केली. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी मुंबई येथे बैठक घेण्याचे मान्य केल्याने टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.अतिउच्च दाब वाहिणीमुळे ६७ मीटर जमीन बाधित होते ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पीक घेता येत नाही. शेतकºयाला जमिनीचा मोबदला देताना तारेखालील जमिनी सोबतच आजूबाजूच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा. अतिउच्च दाब वाहिनीने एकूण शेतकऱ्यांची जेवढी जमीन बाधीत झाली आहे. त्याची भूमीअभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करावी. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. सदर वीज वाहिनीचा वापर व्यावसायिक दृष्टीकोणातून वापर होत असल्यामुळे बाधीत जमिनीचा मोबदला वाणिज्य अकृषक दराने देण्यात यावा. वाहिणीची उभारणी करताना पीक, आणि इतर झाडांची नुकसान भरपाई आजच्या दराने देण्यात यावी. वाहिनीची उभारणी करताना बांधकाम साहित्याचा वापर होतो. दुरुस्ती करताना पिकांची मोठी हाणी होते. त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी जमिनीचा मोबदला देत असताना एका पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असल्यास त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यावे. त्याच व्यक्तीच्या नावावर मोबदला अदा करावा. नुकसानीचे पाहणी कृषी अधिकाऱ्यांकडून करुनच मोबदला द्यावा. उच्च दाब वाहिनीचा भविष्यात कुठल्याही प्रकारची देखभाल व दुरुस्ती करताना शेतकºयांचे नुकसान होवू, यासाठी पिकांच्या होणाºया नुकसानीबाबत उपाययोजनेसंदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावी. तसा शासन निर्णय तयार करण्यात यावा, अशी मागणी आमदार धानोरकर यांनी केली होती.दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शासन निर्णयात दुरस्ती करण्याबाबत मुंबई येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीतील निर्णयाकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.