शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंदेवाही तालुक्यात अवैध रेती उत्खननात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:34 IST

वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देबेकायदेशिर उपसा : भूजलसाठ्यात मोठी घट

राकेश बोरकुंडवार ।आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमानावर विपरीत परिणाम पडला आहे. पाऊस अत्यल्प पडत असल्याने भुजलसाठ्यात मोठी घट होत आहे. अशातच चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पाण्याची मोठी समस्या सिंदेवाही तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.ज्या गावात रेतीघाटाचा लिलाव होवून रेती उपसा सुरु आहे, ते थांबवावे अशी गावकºयांकडून मागणी होत आहे. तालुक्यातील रेतीघाट लिलाव करताना प्रशासनाचे काही नियम आहे. सुरुवातीच्या काही दिवसानंतर या नियमांकडे येथील अधिकारी व कंत्राटदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. कमी दिवसात जास्त आर्थिक लाभ मिळावा, यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून यंत्रणेच्या मदतीने रेतीचा वारेमाप उपसा होत आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.रेती तस्करांमुळे नैसर्गिक खनिज संपतीची सऱ्हा स लूट होत असतानाही कारवाई करण्याऐवजी अभय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने आताच नदीचे पात्र कोरडे पडायला लागले आहे. तर रेतीही कमी पडली असतानाही रात्रंदिवस रेती उपसा केला जात आहे. यामुळे रेतीचे थरच दिसून येत नाही. परिणामी नदी काठावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. ही बाब प्रशासनाला माहिती असतानाही उपाययोजना करण्याऐवजी नियमांना बगल देवून घाटाचा लिलाव केला जातो. मात्र शासनाच्या तिजोरीत अर्धेच आणि कंत्राटदाराला दुप्पट लाभ मिळत असल्याचे दिसून येते.रेती उपसाचे नियम आहेत. रेती तस्कराकडून जर नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर वेळीच आळा घालण्यात येईल. भुगर्भातील जलसाठ्याचा विषय महत्त्वाचा आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल.- स्वप्नील रावडे, प्रभावी तहसीलदार, सिंदेवाही.