शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:19 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

ठळक मुद्देअहवाल : विकास योजनांमध्ये लोकसहभागाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र, वन्य प्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप, नैसर्गिक हालचाली, आहार तसेच प्रजननामध्ये व्यत्यय निर्माण करण्याचे प्रकार न थांबल्याने मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढत होत असल्याचे मागील सात वर्षांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर वनवृत्तातील वनक्षेत्र हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या संरक्षीत क्षेत्रालगत येते. या क्षेत्रातील घनदाट वनसंपदा व जैविक विविधता देशभरातील पर्यटक तसेच संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पर्यटकांचे पाऊल आपुसकच ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. सदर क्षेत्रालगतच बरीच गावे आहेत. गुरे चराईसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी बहुतांश नागरिक जंगलावर निर्भर आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात ग्रामस्थांचा वावर वाढला. त्यातून वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली, आहार आणि प्रजननमध्ये व्यत्यय निर्माण होऊन वन्यप्राण्यांकडून गावकरी अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. लोकसंख्या वाढ, वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग, वाढते औद्योगिकरण आणि वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात निर्माण झालेले अडथळे या बाबीही मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा क्षेत्रामध्ये २०११ ते १२ या कालखंडामध्ये मानव व वन्यजीव संघर्षाच्या ५ हजार ३४४ घटना घडल्या होत्या. त्यावेळी वनविभागाने जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. वन्य प्राण्यांच्या हल्ल्ला प्रकरणात नुकसान झालेल्या नागरिकांना अनुदान देण्यात आले. परिणामी, २०१२-१३ वर्षात ही संख्या ३ हजार ८३ इतकी झाली. २०१३-१४ वर्षात सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिवाय, पशुधन व पीक हाणीच्या ४ हजार ६९० घटना घडल्या. दरम्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली. वन विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाने जागृतीची मोहीम गतिमान करून हा कमी झाला नाही. वन विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार ही संख्या ५ हजार १३० पर्यंत पोहोचली. २०१६-१७ हे वर्ष तर वनविभागासह अभ्यासकांसाठीही चिंतेचे ठरले होते. या वर्षामध्ये ७ हजार २४७ घटना घडल्या. वनाचा वनेत्तर कामासाठी उपयोग टाळणे व वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न होऊनही मानव-वन्यजीव संघर्षाची धग कायम होती. २०१७-१८ या वर्षातही या घटनांची दाहकता कायम असल्याचे अहवालातून दिसून येते. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना प्रभावीपणे राबवूनही मानव- वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकला नाही. चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्यचांदा क्षेत्रातील वनविकास आणि वन्यजीव संरक्षणांसाठी दीर्घकालिन उपाययोजना सुरू आहेत. विकास योजनामध्ये लोकसहभागीही वाढविला जात आहे. मात्र हा संघर्ष कमी न झाला नाही. त्यामुळे योजनेतील त्रुटी शोधून त्या दूर केल्यास मानव आणि वन्यजीव प्राण्यांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलू शकतो, असा आशावाद प्रकल्प क्षेत्रालगतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वन्य व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.विकास योजनांचे करा मूल्यांकनवन्यप्राण्यांच्या हल्ला प्रकरणात तातडीने अनुदान देण्याची प्रभावीपणे सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या घटली. मात्र मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर पर्याय म्हणून शासनाने अनेक योजना सुरु करूनही मूळ समस्या संपली नाही. त्यामुळे योजनांचे मूल्यांकन करण्याची गरज आहे.