शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

सायबर क्राईमचे प्रमाण वाढले

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे.

सावधानतेचा इशारा : बँकेतून खात्री करुनच व्यवहार करावाब्रह्मपुरी : कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठलीही माहिती मोबाईल वर न देता बँकेत परस्पर जाऊन व्यवहार करण्याचे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.मागील आठ दिवसांमध्ये दोन ते तीन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम फसवा कॉल करुन काढल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. निनावी कॉल करुन एटीएम बंद पडल्याचे सांगून सुरु करण्याविषयी आग्रह केला जातो. मी बँकेचाच कर्मचारी बोलत असल्याचे सांगून संपूर्ण माहिती विचारली जाते व काही तासानंतर खात्यामधून शिल्लक रक्कम पूर्णच्या पूर्णच काढली जाण्याचे प्रकार प्रस्तूत प्रतिनिधी व बँक व्यवस्थापनासमोर उघडकीस आले असल्याने पुन्हा ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना सावधनतेचा इशारा दिलेला आहे. कोणताही निनावी कॉल आल्यास आपल्या एटीएम संदर्भात माहिती देवू नये व तशा कॉलवर जास्त वेळ न बोलता तो बंद करुन घ्यावा. त्यानंतर ज्या बँकेत आपला खाता असेल, त्या शाखेत जाऊन विचारपूस करावी. बँकेतून फोन आलाच तर लॅडलाईनवरुन येत असल्याने आपल्या शहराचा कोड नंबर आपल्याला ओळखता येतो. त्यावरुन हा फोन बँकेतूनच आला, हे समजण्यास मदत होत असते. बँक कोणत्याही ग्राहकाला शक्यतो फोन करीत नाही व मोबाईलवरुन तर बँकेचा कोणताही कर्मचारी फोन करीतच नाही. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या निनावी फोनवरुन आपल्या पर्सनल अकाऊंट अथवा एटीएमची माहिती कोणत्याही ग्राहकांनी देऊ नये, असे आवाहन सर्वच बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेदारांना केली आहे. सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा क्राईमचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याने काढल्या गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ग्राहकांनी वाढत्या सायबर क्राईमच्या गुरफट्यात येऊ नये व शंका आल्यास थेट बँकेत संपर्क साधावा, असेही बँक व्यवस्थापन व पोलिसांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)