शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राईमचे प्रमाण वाढले

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे.

सावधानतेचा इशारा : बँकेतून खात्री करुनच व्यवहार करावाब्रह्मपुरी : कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठलीही माहिती मोबाईल वर न देता बँकेत परस्पर जाऊन व्यवहार करण्याचे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.मागील आठ दिवसांमध्ये दोन ते तीन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम फसवा कॉल करुन काढल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. निनावी कॉल करुन एटीएम बंद पडल्याचे सांगून सुरु करण्याविषयी आग्रह केला जातो. मी बँकेचाच कर्मचारी बोलत असल्याचे सांगून संपूर्ण माहिती विचारली जाते व काही तासानंतर खात्यामधून शिल्लक रक्कम पूर्णच्या पूर्णच काढली जाण्याचे प्रकार प्रस्तूत प्रतिनिधी व बँक व्यवस्थापनासमोर उघडकीस आले असल्याने पुन्हा ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना सावधनतेचा इशारा दिलेला आहे. कोणताही निनावी कॉल आल्यास आपल्या एटीएम संदर्भात माहिती देवू नये व तशा कॉलवर जास्त वेळ न बोलता तो बंद करुन घ्यावा. त्यानंतर ज्या बँकेत आपला खाता असेल, त्या शाखेत जाऊन विचारपूस करावी. बँकेतून फोन आलाच तर लॅडलाईनवरुन येत असल्याने आपल्या शहराचा कोड नंबर आपल्याला ओळखता येतो. त्यावरुन हा फोन बँकेतूनच आला, हे समजण्यास मदत होत असते. बँक कोणत्याही ग्राहकाला शक्यतो फोन करीत नाही व मोबाईलवरुन तर बँकेचा कोणताही कर्मचारी फोन करीतच नाही. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या निनावी फोनवरुन आपल्या पर्सनल अकाऊंट अथवा एटीएमची माहिती कोणत्याही ग्राहकांनी देऊ नये, असे आवाहन सर्वच बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेदारांना केली आहे. सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा क्राईमचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याने काढल्या गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ग्राहकांनी वाढत्या सायबर क्राईमच्या गुरफट्यात येऊ नये व शंका आल्यास थेट बँकेत संपर्क साधावा, असेही बँक व्यवस्थापन व पोलिसांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)