शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

निराधारांना मानधनासाठी पाच वर्षांतून एकदाच द्यावे लागणार उत्पन्न प्रमाणपत्र

By साईनाथ कुचनकार | Updated: June 22, 2023 19:02 IST

निराधार व वृद्ध कलावंतांना दिलासा : दरवर्षी द्यावे लागत होते प्रशासनाला प्रमाणपत्र

चंद्रपूर : निराधार तसेच वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते. यामुळे थकत्या काळात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता निराधार व वृद्ध कलावंतांना मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासन आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे वृद्धांना दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्ध कलावंत योजना व इतर मानधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी हयात प्रमाणपत्र तसेच उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. निराधार योजनेंतर्गत मानधन मिळणारे लाभार्थी हे वयोवृद्ध असतात. त्यांच्या उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसतात. त्यातच उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याकरिता अतिरिक्त खर्च होत होता.

वयोवृद्ध लाभार्थ्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास लक्षात घेता मानधन योजनेचा लाभ घेण्याऱ्यांसाठी उत्पन्न प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या वृद्धांचा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निराधार व वृद्ध कलावंत मानधन योजनेत असलेली उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे. आता योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पनाचे प्रमाणपत्र सादर न करता पाच वर्षांतून केवळ एकदाच उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.