शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

बायपास मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास

By admin | Updated: July 29, 2016 01:00 IST

वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा ...

वाहनधारकांची गैरसोय : टोल टॅक्ससाठी मार्गच केला बंद वरोरा : वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा टोल टॅक्स चुकू नये म्हणून सहारा पार्क ते शहरात जाणारा वणी बायबास रोड रेल्वे फाटक बंद करुन गेल्या काही वर्षापासून कायमच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याच मार्गावरील रेल्वे गेटच्या बंद फाटकासमोर मात्र एसटी बसचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा वणी बायपास स्टॉप म्हणून थांबासुद्धा आहेत. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा समूह, कर्मचारी वृंद आणि स्त्री-पुरुष प्रवासी दर दिवशी येथे प्रवासी वाहनातून चढ- उतार करीत असतात. असे करताना सर्वानाच दररोज धोका पत्करून रेल्वे रुळ ओलांडावा लागत आहे. सदर थांबा प्रवाशांना सोयीचा व जवळचा असल्याने, वेळ आणि रिक्षा भाडे यात बचत होत असल्याने हा वणी बायपास बंद असूनही तिथे वर्दळ सुरूच आहे. एक तर नियमानुसार रेल्वे रुळ ओलांडता येत नाही. मात्र सोयीचा व जवळचा असल्याने हा नियम तोडण्याचा मोह नागरिकांना सोडता येत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे अपघात घडून या ठिकाणी लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. तरीही सदर बायपास वापरण्यातच येत आहे. जीवावर उदार होवून हा खेळ सोयीचा म्हणून चालू आहे. त्यामुळे जनतेची ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने नियोजन करुन प्रवशांच्या सोयीकरिता या समस्येतून त्यांची सुटका करावी व रेल्वे गेटवरुन पादचारी मार्ग म्हणून लोखंडी पूल तरी रेल्वे स्टेशन पुलाच्या धर्तीवर जलद उभारावा, अशी मागणी आहे. यामुळे अपघातही टळतील व गोरगरिबांना विद्यार्थी व कर्मचारी तथा सर्वाच्याच ते सोयीचे होईल. उल्लेखनीय म्हणजे या सोबतच सदर लोखंडी पुलामुळे विनाकारण बंद असलेला रस्ता खुला होवून वरोरा शहरांचे प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या साईमंगल चौकाच्या सौदर्यात आणखी भर पडून व्यावसायीक व आर्थिक महत्वही वाढेल.(शहर प्रतिनिधी)