शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बायपास मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास

By admin | Updated: July 29, 2016 01:00 IST

वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा ...

वाहनधारकांची गैरसोय : टोल टॅक्ससाठी मार्गच केला बंद वरोरा : वरोऱ्याच्या रत्नमाला चौक ते वरोरा बसस्थानकापर्यंत चंद्रपूर- नागपूर हायवेवरुन ओव्हरब्रिज निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा टोल टॅक्स चुकू नये म्हणून सहारा पार्क ते शहरात जाणारा वणी बायबास रोड रेल्वे फाटक बंद करुन गेल्या काही वर्षापासून कायमच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याच मार्गावरील रेल्वे गेटच्या बंद फाटकासमोर मात्र एसटी बसचा आणि खासगी ट्रॅव्हल्सचा वणी बायपास स्टॉप म्हणून थांबासुद्धा आहेत. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा समूह, कर्मचारी वृंद आणि स्त्री-पुरुष प्रवासी दर दिवशी येथे प्रवासी वाहनातून चढ- उतार करीत असतात. असे करताना सर्वानाच दररोज धोका पत्करून रेल्वे रुळ ओलांडावा लागत आहे. सदर थांबा प्रवाशांना सोयीचा व जवळचा असल्याने, वेळ आणि रिक्षा भाडे यात बचत होत असल्याने हा वणी बायपास बंद असूनही तिथे वर्दळ सुरूच आहे. एक तर नियमानुसार रेल्वे रुळ ओलांडता येत नाही. मात्र सोयीचा व जवळचा असल्याने हा नियम तोडण्याचा मोह नागरिकांना सोडता येत नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे अपघात घडून या ठिकाणी लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. तरीही सदर बायपास वापरण्यातच येत आहे. जीवावर उदार होवून हा खेळ सोयीचा म्हणून चालू आहे. त्यामुळे जनतेची ही गरज लक्षात घेऊन संबंधित विभागाने नियोजन करुन प्रवशांच्या सोयीकरिता या समस्येतून त्यांची सुटका करावी व रेल्वे गेटवरुन पादचारी मार्ग म्हणून लोखंडी पूल तरी रेल्वे स्टेशन पुलाच्या धर्तीवर जलद उभारावा, अशी मागणी आहे. यामुळे अपघातही टळतील व गोरगरिबांना विद्यार्थी व कर्मचारी तथा सर्वाच्याच ते सोयीचे होईल. उल्लेखनीय म्हणजे या सोबतच सदर लोखंडी पुलामुळे विनाकारण बंद असलेला रस्ता खुला होवून वरोरा शहरांचे प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या साईमंगल चौकाच्या सौदर्यात आणखी भर पडून व्यावसायीक व आर्थिक महत्वही वाढेल.(शहर प्रतिनिधी)