कृषी विभागाचे मार्गदर्शन : शेतकऱ्याला लाभगुंजेवाही : सिंदेवाही तालुका हा भात लागवडीत प्रमुख आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरीपात तर भात लागवड होतेच परंतु, उन्हाळी हंगामातसुद्धा भात पिकाची लागवड करुन येथील प्रयोगशिल शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे.आंबोली येथील प्रयोगशिल शेतकरी सुनील उट्टलवार यांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरीता त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने आपल्या शेतात सुधारीत पद्धतीने भात पिकाची रोवणी एक हेक्टर क्षेत्रावर केली आहे. भात पिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करुन भाताचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. भात पिकासह त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला पिकाची लागवड केलेली असून गादीवाफ्यावर कारली लागवड १.२० हेक्टर, कोबी लागवड लागवड १.२० हेक्टर, वांगी लागवड ०.६० हेक्टर, जनावरांकरीता चारा न्युट्रिफिट लागवड ०.२० हेक्टर क्षेत्रावर केली आहे. त्यांनी संकरीत म्हशीचे पालन करून पारंपारिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे. कोणत्याही एकाच प्रकारच्या शेती उत्पादनावर आधारीत न राहता आर्थिक शाश्वतता राखण्यासाठी बहुपीक पद्धतीचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रात्यक्षिक क्षेत्राला तालुका कृषी अधिकारी अजय आटे, मंडळ कृषी अधिकारी भिसे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. कार्यास्थापन एस.आर. खोब्रागडे, कृषी सहायक लाडबोरी या करीत आहेत. (वार्ताहर)
आंबोलीत सुधारित पद्धतीने भात लागवड
By admin | Updated: March 3, 2016 01:10 IST