शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बंदीतही सुगंधित तंबाखूची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही.

ठळक मुद्देपानटपऱ्यांवर कारवाई : तंबाखूचे मोठे तस्कर मात्र मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडका लावला आहे. शहरातील पानटपºयावरील खर्राला त्यांनी लक्ष केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध घेण्याची तसदी अद्याप त्यांनी घेतली नाही. पोलीस प्रशासनाच्या हातीसुद्धा अपवाद वगळता आजवर तंबाखूचा मोठा साठा मिळालेला नाही.जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही. सुत्रानुसार मध्यप्रदेशातील रायपूर, दुर्ग आणि भिल्लई येथून तंबाखूची तस्करी केली जाते.मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या भागात हा तंबाखू आणला जातो. विशेषत: गडचिरोली यासाठी सुरक्षित समजला जातो. जिथून घाऊक विक्रेत्यांना आणि त्यानंतर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तो पोहचविला जातो. चंद्रपुरात आणि बल्लारपुरातील तस्कर या घाऊक विक्रेत्यांची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे. रायपूर ते गडचिरोली, गडचिरोली ते चंद्रपूरपर्यंत सुगंधित तंबाखू सुखरूप आणण्यासाठी लाखो रूपये महिन्याकाठी संबंधितांना दिले जातात. त्यामुळे आजवर या व्यापाºयांवर कारवाई झाली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.बंदी असताना जिल्हाभरात हजारो पानटपरीवर खुल्लेआम सुगंधित तंबाखू व त्यापासून तयार होणारे खर्रे मिळत आहे.तस्करीची साखळी शोधण्याची गरजपानटपºया आता रोजगाराचे माध्यम झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली की स्थानिक लोकप्रतिनिधी अडवणूक करतात. या नेत्यांचाही पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला एकच प्रश्न असतो की तंबाखू येतो कुठून, याचे उत्तर मात्र ते देवू शकत नाही. ज्यांच्या पानटपरीवर तंबाखू जप्त केला जातो. त्यांच्याकडून याची माहिती पोलिसांना मिळू शकते. ही साखळी शोधून काढता येते. परंतु पानटपरी चालकांकडून तंबाखू जप्त करण्यापलिकडे या अधिकाºयांची कारवाई पुढे जात नाही. असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मोठे तस्कर अद्यापही पोलिसांच्या आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून दूर आहे. चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहूनच सुगंधित तंबाखूचे किरकोळ विके्रत्यांना खुलेआम वितरण केले जाते. याची माहिती पोलिसांनाही आहे. परंतु ते ही याकडे डोळेझाक करतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पानटपरीवरील कारवाईच्या निमित्ताने फाद्यां छाटण्याचे नाटक केले जाते. परंतु मुळावर घाव घालण्यात अर्थकारण आडवे येते अशी चर्चा आहे. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी