शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

ठरावानंतरही अंमलबजावणी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:06 IST

नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीने नागरिक त्रस्त : रस्त्याच्या कडेला थाटली दुकाने

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषदेने ठराव घेऊन जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरात तीन महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा इंग्रज कॉन्व्हेंट आहेत. हजारोंपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी शहरातील सायकलने शाळा-महाविद्यालयात जातात. शहरात वाहनांची संख्या वाढली पण रस्ते हरवून बसले. अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेड उभारणी करून त्यातच दुकाने थाटली. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. मोठे व्यापाऱ्यांची जड वाहने शहरात येतात. वाहनातून साहित्य उतरविण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील दररोज होणारी वाहतूक प्रभावित होते. दोन वाहने एकमेकांसमोर आल्यानंतर नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. शहरातील जड वाहतूक बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत अस्तित्वात असल्यापासून केल्या जात होती.मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या समस्येने गंभीर रूप घेतले. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतरण झाले. दरम्यान शहरातील जड वाहतूक बंद करण्याचा ठराव नगरपरिषदने पारीत केला होता. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शहरातील वाहतुककोंडी लक्षात घेऊन या ठरावाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे वाटत होते. पण हा ठराव कागदावरच राहिला. मनमानी चालणाऱ्या वाहनांमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे.जडवाहतुकीला आळा बसला नाही. सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे हाल होतात. नगरपरिषद पदाधिकाºयांना ही समस्या माहिती असूनही कुणी बोलायला तयार नाही. शहरातील जड वाहतूक मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे.न. प. कार्यकारी मंडळाने यासंबंधीचा ठराव पारित केला आहे. व्यापाऱ्यांना नोटीसाद्वारे सूचना देण्यात येणार आहे. या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करू.- चंद्रकांत चव्हाण,मुख्याधिकारी, न.प.नागभीड