शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रातील गावांमध्ये वनऔषधी उत्पादनाचा प्रकल्प राबविणार

By admin | Updated: September 5, 2016 00:56 IST

निसर्गाची आवड असणाऱ्या तसेच ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या जगातील गणमान्य अभ्यागतांची सुविधा व्हावी ...

चंद्रपूर : निसर्गाची आवड असणाऱ्या तसेच ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या जगातील गणमान्य अभ्यागतांची सुविधा व्हावी तसेच वाघांच्या संवर्धनाचा येथून विचार व्हावा, यासाठी वनविभागाचे सुसज्य वनविश्रामगृह बांधण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.रामबाग वन वसाहतीच्या परिसरात सुमारे ४ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या वन विश्रामगृहाच्या बांधकामाचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन विभागातील पाच सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या हस्ते भूमिपुजन तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, क्षेत्र संचालक जी.पी.गरड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल व पंचायत समिती सभापती बंडू माकोडे उपस्थित होते.व्याघ्र संवर्धनाची संकल्पना मांडताना, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगात केवळ १४ देशातच वाघांचे अस्तित्व असून नागपूर हे टायगर कॅरिडोर म्हणून ओळखले जाते. ३०० किलो मिटरच्या परिघात चारशे वाघ आहेत. सर्वोतम वाघ ताडोबा परिसरातील असल्यामुळे व निसर्गाची आवड असणाऱ्या जगातील नामवंत व्यक्ती चंद्रपूर ताडोबाला भेट देतात. त्यामुळेच रामबाग परिसरात वनविश्रामगृह बांधण्यात येणार असून हे विश्रामगृह येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.रोजगार निर्मितीमध्ये वनविभागाचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे वनक्षेत्रातील गावांमध्ये वनऔषधी उत्पादनाचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे सांगताना ना. मनगंटीवार म्हणाले, उत्तम प्राणवायू, पर्यटन आणि वनऔषधी समृध्द वनक्षेत्रातच उपलब्ध आहे. राज्यात जंगल टिकविण्यासाठी आदिवासींची महत्वाची भूमिका असून अशा गावांमध्ये वनविभागातर्फे विकासाच्या योजना राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सासंगितले.दोन कोटी ८३ लक्ष वृक्ष लागवडीचा उपक्रम पूर्ण केल्यानंतर ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारीत केले आहे. या उपक्रमाची लिंमका बुकने दखल घेतली असून जगातील पाच रेकार्ड कायम केले असून चंद्रपूर जिल्हा विकासामध्ये राज्यात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात चंद्रपूर वनक्षेत्रात ३०६ कोटी रुपयाचे विविध २२ कामे सुरु आहेत. जिल्ह्यात ११ निसर्ग उद्याने, जैवविविधता पार्क तसेच बांबुवर आधारीत संशोधन केंद्राची निर्मिती होत आहे. चंद्रपूर प्रमाणेच पोंभूर्णा येथे वनविश्रामगृह बांधण्यात येणार असून लेपर्ड सफारी, गौण वनावर आधारीत २८ लक्ष रुपये खर्चून वनधन केंद्र येत्या दीड महिन्यात सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)अमिताभ बच्चन येणारपर्यावरणाचे सैनिक असलेल्या वनकर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी सुप्रसिध्द अभिनेते व व्याघ्र अँबेसेडर अभिताभ बच्चन यांनी ताडोबाला भेट देण्याचे मान्य केले आहे. वसुंधरेच्या सुरक्षेची जबाबदारी वनविभागाची असून वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह बांधण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली.