शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिल्हयात ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

चंद्रपूरः जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने बिबट संवेदनशील गावामधुन बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबवावी, अशी मागणी इको-प्रो चे ...

चंद्रपूरः जिल्हयातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने बिबट संवेदनशील गावामधुन बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबवावी, अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

जंगलालगतची किंवा जंगलव्याप्त गावातील जंगलावर निर्भरता असणारे गावकरी, गुराखी दाट जंगलात, वाघांच्या अधिवासात गेल्यानंतर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू किंवा जखमी होतात. मात्र ‘बिबट’ सारखा वन्यप्राणी थेट गावात येतो, बिबटाचे खाद्य निर्भरता गावात पूर्ण होत असल्याने गावालगत त्याचा वावर असतो. त्यामुळे गावात, गावालगत किंवा शेतशिवारात बिबटयाकडुन मानव मृत्यू किंवा जखमीच्या घटना सातत्याने होतात. यातुनच मानव-वन्यप्राणी सघर्ष वाढतो. मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी बिबट समस्यामुक्त ग्राम ही योजना राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्षास कारणीभुत असलेले वाघ-बिबटच्या अनुषंगाने वनविभाग व जिल्हा प्रशासनाकडे संघर्ष निवारण्याच्या अनुषंगाने मागील काही वर्षापासुन इको-प्रो संस्था प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणुन वर्ष २०१८ ला ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ या योजनेची संकल्पना इको-प्रो कडुन ठेवण्यात आली. याबाबत वेळोवेळी वनविभाग, जिल्हा प्रशासनासमोर सादरीकरण केल्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सुध्दा सादरीकरण करण्यात आले. त्यांनतर ही योजना जिल्हा परीषद, चंद्रपूर तर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बाॅक्स

सध्यास्थीतीत ब्रम्हपुरी परिसरात बिबट संघर्षात नुकताच दोन महिलांना जीव गमवावा लागला. चंद्रपूर जिल्हयात मागील बारा वर्षात बय्ट्याच्या हल्ल्यात ५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. या सर्व घटना गावात किंवा गावालगत झाल्या आहेत. बिबटचा नेमका वावर हा गावालगत राहत असल्याने, गावावर त्याची निर्भरता असल्याने, गावासभोवताल तयार झालेले झाडी-झुडपे वाढून बिबटयास पोषक असे अधिवास निर्माण झाल्याने होत आहे.

बाॅक्स

चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हासोबतच आता ‘व्याघ्र जिल्हा’ आहे. जिल्हयातील जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह सर्वाधिक वाघ असल्याचे भुषणावह बाब आहे. मात्र वाढते वाघ व वन्यप्राणी सोबतच वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष आता या जिल्हयाचा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्हयात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे.