शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण कंपनीला माहित आहे. त्यांनीच आपल्याला माहिती दिली असल्याचे उत्तर देऊन खळबळ उडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ना. हंसराज अहीर यांच्यासह उपस्थित अधिकारी चांगलेच चक्रावले.जिल्हा परिषदेमध्ये ना. अहीर यांनी सोमवारी आढावा सभा घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मंत्रीमदोहय चांगलेच संतापले. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबतची आजची स्थिती विचारून किती योजना सुरु आहे, कोणत्या योजना बंद आहे. याबाबत माहिती विचारली. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वीज कनेक्शनमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी असतानाही त्यामधून शेतकरी आणि काही नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. जर अवैध कनेक्शन आहे आणि पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी आहे तर तक्रार करण्यास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. थातुरमातूर उत्तर देण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे अनेक योजनांचा बट्याबोळ उडत असल्याचे दिसले.(नगर प्रतिनिधी)