शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण कंपनीला माहित आहे. त्यांनीच आपल्याला माहिती दिली असल्याचे उत्तर देऊन खळबळ उडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ना. हंसराज अहीर यांच्यासह उपस्थित अधिकारी चांगलेच चक्रावले.जिल्हा परिषदेमध्ये ना. अहीर यांनी सोमवारी आढावा सभा घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मंत्रीमदोहय चांगलेच संतापले. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबतची आजची स्थिती विचारून किती योजना सुरु आहे, कोणत्या योजना बंद आहे. याबाबत माहिती विचारली. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वीज कनेक्शनमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी असतानाही त्यामधून शेतकरी आणि काही नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. जर अवैध कनेक्शन आहे आणि पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी आहे तर तक्रार करण्यास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. थातुरमातूर उत्तर देण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे अनेक योजनांचा बट्याबोळ उडत असल्याचे दिसले.(नगर प्रतिनिधी)