शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:29 IST

जात पडताळणी व बोगस आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन: आदिवासी विकास मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जात पडताळणी व बोगस आदिवासी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवामुक्त करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. शासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर खोट्या जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत दाखल झालेल्या कर्मचाºयांचे संरक्षण तात्काळ प्रभावाने काढून टाकावे, १५ जून १९९५ व २१ आॅक्टोबर २०१५ रोजी जारी केलेले परिपत्रक रद्द करावे, याशिवाय अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरणाºया कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी. शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित व विना अनुदानित संस्था, सार्वजनिक उपक्रम, सहकारी बँक अशा विविध क्षेत्रात खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारावर दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील कर्मचारी व अधिकाºयांना त्वरीत सेवेतून काढून टाकावे, खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राखीव जागेवर प्रवेश देताना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीविना हमीपत्राद्वारे प्रवेश दिला जात आहे. हा प्रकार बंद करावा, सहा महिन्यांची अट पूर्णत: रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी, आदिवासी विकास विभागात कर्मचारी व अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय योजनांची योग्य अंमलबजावणी केली जात नाही, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यावेळी आदिवासी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव प्रा. धीरज शेडमाके सुधाकर कन्नाके, ज्योतीराव गावडे, सारंग कुमरे, उमाजी कोडापे आदी उपस्थित होते.