शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:51 IST

कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,....

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : नागपुरात कृषी वैज्ञानिकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी, ज्या कीटकनाशकांमुळे शेतमजुरांना मृत्यूस सामोरे जावे लागले, अशा सर्वच विषारी कीटकनाशकांवर तत्काळ बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारचे परिपत्रक काढू, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.वरिष्ठ कृषी आणि कापूस वैज्ञानिकांसोबत नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. नागपुरातील रवि भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. वाघमारे, आरोग्य उपसंचालक डॉ. जयस्वाल व अन्य वैज्ञानिक, तज्ज्ञांची उपस्थिती होती.कीटकनाशकांमुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या पीडित कुटुंबीयांना भरीव मोबदला दिला जाईल, याकरीता केंद्र सरकारकडे मोबदल्यात वृद्धी करण्याबाबत शिफारस करू, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.मनुष्याकरिता घातक असलेल्या विषारी कीटकनाशकांची प्रतवारी ठरवून तशी यादी तयार करावी व ही कीटकनाशके विक्रीकरीता उपलब्ध असल्यास ती संबंधित दुकाने व कृषी केंद्राकडून त्वरित हटविण्याची कार्यवाही होईल या अनुषंगाने गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निर्देश ना. अहीर यांनी दिले.कापसाच्या वाढीबाबत बोलताना या पिकांची उंची वाढली. मात्र बोंडांची संख्या अल्प प्रमाणात का, याचेही संशोधन व त्यामागील कारणे वैज्ञानिकांनी शोधावीत. जेणेकरून शेतकºयांना उत्तम पिकासाठी वारंवार कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ उद्भवणार नाही व अशा परिस्थितीत कोणते उपाय अंमलात आणून मुबलक पीक घेण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून उचित मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेवरही केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये अधिकाºयांना सांगितले.