शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक

By admin | Updated: May 18, 2015 01:24 IST

लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे.

मूल : लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील ट्रकद्वारे अशी अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून आहे. मात्र यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.उन्हाळा म्हटला की उन्हाची दाहकता व त्याचबरोबर लग्नाची धूम बघायला मिळत असते. विशेषत: मे महिन्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने अंगाची लाहीलाही होत असते. त्यातच लग्न म्हटले की, जीवाचा आटापिटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नवरदेवाचे वऱ्हाड वधुमंडपी नेताना ट्रकमध्ये वऱ्हाड्यांना अक्षरश: कोंबून बसविले जाते. वाहनचालकाला थोडेफार पैशाचे आमिष दाखविले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसविले जाते. अशावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आधीच ओव्हरलोड वाहन असते. त्यातही ते भरधाव वेगाने चालविल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतूक शिपायाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शिपाई त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबल्यास चालकाचे नियंत्रण कसे काय राहाणार? यासाठी ट्रकद्वारे लग्नाच्या वराती नेण्यास बंधने घातली पाहिजे आणि ट्रकची क्षमता लक्षात घेऊनच त्याच प्रमाणात प्रवासी नेण्यास पोलिसांनी बाध्य केले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)