शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक

By admin | Updated: May 18, 2015 01:24 IST

लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे.

मूल : लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील ट्रकद्वारे अशी अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून आहे. मात्र यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.उन्हाळा म्हटला की उन्हाची दाहकता व त्याचबरोबर लग्नाची धूम बघायला मिळत असते. विशेषत: मे महिन्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने अंगाची लाहीलाही होत असते. त्यातच लग्न म्हटले की, जीवाचा आटापिटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नवरदेवाचे वऱ्हाड वधुमंडपी नेताना ट्रकमध्ये वऱ्हाड्यांना अक्षरश: कोंबून बसविले जाते. वाहनचालकाला थोडेफार पैशाचे आमिष दाखविले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसविले जाते. अशावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आधीच ओव्हरलोड वाहन असते. त्यातही ते भरधाव वेगाने चालविल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतूक शिपायाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शिपाई त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबल्यास चालकाचे नियंत्रण कसे काय राहाणार? यासाठी ट्रकद्वारे लग्नाच्या वराती नेण्यास बंधने घातली पाहिजे आणि ट्रकची क्षमता लक्षात घेऊनच त्याच प्रमाणात प्रवासी नेण्यास पोलिसांनी बाध्य केले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)