शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक

By admin | Updated: May 18, 2015 01:24 IST

लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे.

मूल : लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील ट्रकद्वारे अशी अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून आहे. मात्र यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.उन्हाळा म्हटला की उन्हाची दाहकता व त्याचबरोबर लग्नाची धूम बघायला मिळत असते. विशेषत: मे महिन्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने अंगाची लाहीलाही होत असते. त्यातच लग्न म्हटले की, जीवाचा आटापिटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नवरदेवाचे वऱ्हाड वधुमंडपी नेताना ट्रकमध्ये वऱ्हाड्यांना अक्षरश: कोंबून बसविले जाते. वाहनचालकाला थोडेफार पैशाचे आमिष दाखविले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसविले जाते. अशावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आधीच ओव्हरलोड वाहन असते. त्यातही ते भरधाव वेगाने चालविल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतूक शिपायाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शिपाई त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबल्यास चालकाचे नियंत्रण कसे काय राहाणार? यासाठी ट्रकद्वारे लग्नाच्या वराती नेण्यास बंधने घातली पाहिजे आणि ट्रकची क्षमता लक्षात घेऊनच त्याच प्रमाणात प्रवासी नेण्यास पोलिसांनी बाध्य केले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)