शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अंधारी नदीतून रेतीची अवैध वाहतूक

By admin | Updated: January 7, 2015 22:51 IST

मूल तालुक्यातील चिरोली-सुशी मार्गावरील अंधारी नदीतून वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेतीचे अवैधरित्या उत्खनन सुरु आहे. आर्थिक तडजोडीतून रेती भरलेले ट्रॅक्टरला सोडले जात

सुशी दाबगाव: मूल तालुक्यातील चिरोली-सुशी मार्गावरील अंधारी नदीतून वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेतीचे अवैधरित्या उत्खनन सुरु आहे. आर्थिक तडजोडीतून रेती भरलेले ट्रॅक्टरला सोडले जात असतानाच नलेश्वर-सुशी घाटावरुनही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या सुशी-दाबगाव या गावालगत अंधारी नदी वाहते. याचा फायदा घेत काही रेती माफियांनी रात्री व पहाटेच्या सुमारास रेतीचे अवैध उत्खनन गेल्या अनेक महिन्यापासून सुरु केले आहे. बांधकामाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासनाने रेती घाटांचे अद्यापही लिलाव केलेले नाही. तर लिलाव होऊनही टीपीचा खर्च किंवा दर परवडणारे नसल्याचे कारण समोर करुन काही ट्रॅक्टर आणि ट्रक मालकांनी आपला मोर्चा अवैध रेती उत्खननाकडे वळविला आहे. कमी खर्चात जास्त पैसा मिळवण्याच्या हव्यासेपोटी ट्रॅक्टर आणि ट्रक मालकांनी रस्ता तयार करुन सुशी दाबगाव जवळून जाणऱ्या अंधारी नदीतून आणि नलेश्वर घाटावरुन रेती तस्करी सुरु आहे. चिरोली, टोलेवाही, खालवसापेठ, कांतापेठ, उथळपेठ नलेश्वर, देहगाव, मानकापूर, चिचाळा हळदी आदी गावात रेतीची अवैध वाहतूक होत असून चोरीचा व्यवसाय चांगलाच तेजीत सुरु आहे. अंधारी नदीतून सुशी, नलेश्वर घाटावरुन नलेश्वर मार्गावरुन रेतीची अवैध तस्करी केली जात असतानाही त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही तालुका प्रशासन करीत नाही. यामुळे शासनाच्या लाखोचा महसूल पाण्यात बुडत आहे.रेतीचे अवैध उत्खनन तलाठ्याच्या व वनविभागाच्या आशिर्वादाने सुरु असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांत सुरु आहे. अधिकारी व तस्करांचे आर्थिक सबंध असल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेती माफीया व तलाठी यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (वार्ताहर)