शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘त्या’ १५८ भूखंडांवर अवैध कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:59 IST

चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांतील ले-आऊटमध्ये सार्वजनिक मालकीचे सुमारे १५८ भूखंड आहेत. या भूखंडाचा सातबारा व मालकी हक्काचे कागदपत्र नाहीत. मात्र, काही व्यक्तींनी या भूखंडावर कब्जा केला. मनपाचे पथक त्याठिकाणी करमूल्यांकनास गेल्यास बेकायदेशीर ताबा मिळविणारे आडकाठी आणतात. ‘जमीन आमचीच आहे’ असा दम देतात. यामुळे मनपाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देमनपाचे कोट्यवधीचे नुकसान : करपथक भूखंडावर गेल्यास देतात धमकी

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांतील ले-आऊटमध्ये सार्वजनिक मालकीचे सुमारे १५८ भूखंड आहेत. या भूखंडाचा सातबारा व मालकी हक्काचे कागदपत्र नाहीत. मात्र, काही व्यक्तींनी या भूखंडावर कब्जा केला. मनपाचे पथक त्याठिकाणी करमूल्यांकनास गेल्यास बेकायदेशीर ताबा मिळविणारे आडकाठी आणतात. ‘जमीन आमचीच आहे’ असा दम देतात. यामुळे मनपाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.चंद्रपूर शहरातील ६६ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी ले-आऊटमध्ये सार्वजनिक मालकीचे खुले भूखंड (ओपन स्पेस) आहेत. कर आकारणीकरिता मनपाने काही महिन्यांपूर्वी या भूखंडाचे सर्वेक्षण केले असतात १५८ भूखंड बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. या भूखंडांचे महसुली दस्तावेज उपलब्ध नाहीत. सातबारा नसल्याने कर आकारणी कशी करायची, हा प्रश्न मनपापुढे निर्माण झाला. दरम्यान भूखंडावर अवैध कब्जा होऊ नये, याकरिता मनपाने कार्यवाही सुरू केली होती. संबंधित पथक त्या भूखंडावर गेले असता कब्जा करणाऱ्या व्यक्तिंनी अटकाव केला. त्यामुळे या पथकाने माघार घेतली. शहरामध्ये ५ हजार ६७ भूखंडांवर भोगवटदारांची नावे नोंदविण्यात आली आहे.मनपाने त्यांच्याकडून करवसूली सुरू केली. मात्र १५८ भूखंडांची सातबाºयावर अधिकृत नोंद करायची नाही. शिवाय मनपाकडे मालकी हक्काचे कागदपत्र मागितल्यास कानाडोळा करायचा, असा प्रकार कथित भूखंडधारकांकडून सुरू आहे. कर चुकवेगिरी करणाºया या भूखंडधारकावर कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी मनपाने अद्याप कडक भूमिका घेतली नाही. याचाच गैरफायदा घेत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.‘अकोला पॅटर्न’ चंद्रपुरातही राबविण्याची गरजमहानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांचा रेक्रार्ड उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मंडल अधिकारी व तलाठ्यांनी ही माहिती गोळा करुन अहवाल तयार केला. अशा भूखंडांवर कोणाचीही मालकी नसल्याचे स्पष्ट होताच शासनाच्या नावाने सातबारा तयार करण्याची प्रक्रिया मागील आठवड्यातच पूर्ण करण्यात आली होती. चंद्रपूर मनपा हद्दीतील १५८ भूखंडाबाबत हीच भूमिका घेतल्यास येथील सातबारेदेखील शासनाच्या नावाने तयार होऊ शकतात. यासाठी मनपाने जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.भूखंडांवर फ लक लावाशहरातील १५८ भूखंडांवर सद्यस्थितीत कुणाचीही मालकी नाही. काही व्यक्तींनी या भूखंडांवर ताबा मिळविला. परंतु त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मागील ३० ते ४० वर्षांपासून या भूखंडांवर मनपाने कर आकारणी केली नाही. मनपाच्या सभेतही हा विषय अद्याप प्रभावीपणे मांडण्यात आला नाही, असा आरोप आहे.