शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेवर अवैध खनन

By admin | Updated: April 7, 2017 00:58 IST

पत्रकार परिषदेत माहिती : उपोषणाचा इशाराचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती

पत्रकार परिषदेत माहिती : उपोषणाचा इशाराचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याची माहिती नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.माहिती देताना व्यंकटेश एकरे म्हणाले, भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील आपल्या मालकीची जमीन चंद्रकांत वासाडे नामक यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्ट्याने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नुतनीकरण झाले नाही. याचाच फायदा घेत सन २००० मध्ये चंद्रकांत वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतात खनन करण्यासाठी एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून खनन सुरू केले. ही बाब जेव्हा आपल्या लक्षात आली तेव्हा खनिकर्म विभागाला पत्र देवून खनन थांबविण्याची विनंती केली. परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे एकरे यांनी सांगितले. यानंतर चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. शेतीचे दस्ताऐवज खासगी व सरकारी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यात आले. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार आपले हस्ताक्षर नसल्याचे सिद्ध झाले. भाडेपट्ट्यावर केलेले हस्ताक्षर वासाडे व त्यांचे व्यवस्थापक सुधेश पाल यांचे असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार आपण वरोरा पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २००२ ला पहिली तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. २७ जुलैला पुन्हा तक्रार केल्यानंतर एफआरआय दाखल करून मोका चौकशी करण्यात आली. त्यानंतर फौजदारी खटला सुरू झाला व निकाल आपल्या बाजूने लागला, असे एकरे यांनी सांगितले.अनेक प्रयत्नानंतरही चंद्रकांत वासाडे हे जमिनीचा ताबा देण्यास नकार देत असून प्रशासनही त्यांना पाठबळ देत आहे. नियमाप्रमाणे जमिनीचा आपण शेतसारा भरत असून २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा देण्याचा निर्णय दिला. मात्र या निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे माझ्या मालकीच्या शेतात ५० फुटापर्यंत खोल अवैध खनन केले जात आहे. याबाबत लोकशाही दिनातही तक्रार नोंदविण्यात आली. दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मी हतबल झालो असून प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय मिळूवन द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)