शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भाडेपट्ट्याने दिलेल्या जागेवर अवैध खनन

By admin | Updated: April 7, 2017 00:58 IST

पत्रकार परिषदेत माहिती : उपोषणाचा इशाराचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती

पत्रकार परिषदेत माहिती : उपोषणाचा इशाराचंद्रपूर : भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनीवर शेतमालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर खनन करून शेतीचे नुकसान केले जात आहे. जमीन विकलेली नसतानाही जमिनीचा ताबा देण्यास भाडेकरू नकार देत असल्याची माहिती नंदोरी (बु.) येथील शेतकरी व्यंकटेश एकरे, मुलगा धनंजय एकरे व अंकुश काळे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.माहिती देताना व्यंकटेश एकरे म्हणाले, भद्रावती तालुक्यातील नंदोरी (खुर्द) येथील सर्व्हे नं. ७८ (जुना ७१) येथील आपल्या मालकीची जमीन चंद्रकांत वासाडे नामक यांना १९८१ ते १९९६ मध्ये भाडेपट्ट्याने दिली होती. १९९७ पर्यंत भाडेपट्ट्याचे नुतनीकरण झाले. मात्र त्यानंतर नुतनीकरण झाले नाही. याचाच फायदा घेत सन २००० मध्ये चंद्रकांत वासाडे यांनी तत्कालीन खनिकर्म अधिकारी रामटेके यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतात खनन करण्यासाठी एप्रिल २००६ पर्यंत लीज काढून खनन सुरू केले. ही बाब जेव्हा आपल्या लक्षात आली तेव्हा खनिकर्म विभागाला पत्र देवून खनन थांबविण्याची विनंती केली. परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे एकरे यांनी सांगितले. यानंतर चंद्रपूर न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. शेतीचे दस्ताऐवज खासगी व सरकारी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यात आले. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार आपले हस्ताक्षर नसल्याचे सिद्ध झाले. भाडेपट्ट्यावर केलेले हस्ताक्षर वासाडे व त्यांचे व्यवस्थापक सुधेश पाल यांचे असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार आपण वरोरा पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २००२ ला पहिली तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. २७ जुलैला पुन्हा तक्रार केल्यानंतर एफआरआय दाखल करून मोका चौकशी करण्यात आली. त्यानंतर फौजदारी खटला सुरू झाला व निकाल आपल्या बाजूने लागला, असे एकरे यांनी सांगितले.अनेक प्रयत्नानंतरही चंद्रकांत वासाडे हे जमिनीचा ताबा देण्यास नकार देत असून प्रशासनही त्यांना पाठबळ देत आहे. नियमाप्रमाणे जमिनीचा आपण शेतसारा भरत असून २०१४ ला दिवाणी न्यायालयाने जमिनीचा ताबा देण्याचा निर्णय दिला. मात्र या निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे माझ्या मालकीच्या शेतात ५० फुटापर्यंत खोल अवैध खनन केले जात आहे. याबाबत लोकशाही दिनातही तक्रार नोंदविण्यात आली. दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मी हतबल झालो असून प्रशासनाने आपल्याला पुढील १५ दिवसांत न्याय मिळूवन द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा व्यंकटेश एकरे व मुलगा धनंजय एकरे यांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)