शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वनसंरक्षणाकडे होतोय दुर्लक्ष

By admin | Updated: November 12, 2016 00:59 IST

मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

कोठारी वनपरिक्षेत्र : अधिकारी कर्मचारी सुस्तकोठारी : मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जिवीतास व जंगल क्षेत्रास अवैध वृक्ष तोडीने धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कोठारी वनपरिक्षेत्रातंर्गत करंजी उपवनक्षेत्रातील धानापूर शेत शिवारात नुकतेच विद्युत प्रवाहाने पट्टेदार वाघाच्या मृत्युने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जंगल क्षेत्रालगत शेतशिवार असल्याने उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून होणे नित्याची बाब बनली आहे. पिकाचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून वनविभागाला करण्यात आल्या होत्या. मात्र वनविभागाकडून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होते. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतो. त्यामध्ये कधीकाळी वन्यप्राण्यांचा बळीसुद्धा जात असतो. यामध्ये कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी, करंजी, घोसरी, पोंभूर्णा उपवनक्षेत्रात शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनेत अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेला आहे. वन्यप्राण्यांवर प्रतिबंध करण्याच्या मागणीकडे वनाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पीक बचावात्मक पाऊल उचलावे लागते. त्यामध्ये वन्यप्राण्याचे बळी जातात. मात्र वनविभागांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे वेळीच लक्ष केंद्रीत करून कर्मचाऱ्यांच्या गस्ती वाढवून वन्य प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे पीक व वन्य प्राण्यांचे जीव वाचले असते.मागील महिण्यात कुडेसावली शेतशिवारात धुमाकुळ घालणाऱ्या चार वन्यप्राण्याची शिकार करण्यात आली. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाली. मात्र याकडे वनाधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने सदर प्रकारावर पांघरून पडले.कोठारी वनपरिक्षेत्रातील जंगलात सध्या अवैध वृक्षतोडीला उधान आले आहे. साग वृक्षासारखे मुल्यवान वृक्षांची सऱ्हासपणे अवैध धंदेवाले कटाई करीत आहेत. नयन रम्य उभे जंगल बकाल होत आहे. याकडे वनाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही व ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्रात अवैद्य धंदे वाढत आहेत. (वार्ताहर) पट्टेदार वाघाचे मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्नकरंजी उपवनक्षेत्रातील धानापूर येथे वाघाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. त्यानंतर शेतकऱ्याने बचावात्मक पवित्रा घेत शेतातच वाघाला पुरले. या प्रकाराची चर्चा सतत दोन दिवस रंगली. ती कोठारीपर्यंत पोहचली. मात्र सदर प्रकाराबाबत वनकर्मचाऱ्यांना माहिती नव्हती, असे असले तरी वास्तविकता निराळीच आहे. वाघाच्या मृत्यूनंतर उधाण आलेली चर्चा स्थानिक वनकर्मचाऱ्यापर्यंत त्याच रात्री पोहचली,मात्र सदर प्रकार दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच व हत्या करणारा शेतकरी स्वत: वनविभागात दाखल झाल्याने प्रकरण अंगलट येवू नये, म्हणून सदर प्रकाराच उलगडा झाला नाही. अन्यथा हे प्रकरण दाबण्यात आले असते. अशी चर्चा या परिसरात मोठ्या जोरात सुरु आहे. परंतु आम्ही घटनेचा शोध लावला असता, असे वनकर्मचारी सांगत आहेत.