शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वनसंरक्षणाकडे होतोय दुर्लक्ष

By admin | Updated: November 12, 2016 00:59 IST

मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

कोठारी वनपरिक्षेत्र : अधिकारी कर्मचारी सुस्तकोठारी : मध्य चांदा वनविभागातंर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी व जंगल संरक्षणाकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जिवीतास व जंगल क्षेत्रास अवैध वृक्ष तोडीने धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कोठारी वनपरिक्षेत्रातंर्गत करंजी उपवनक्षेत्रातील धानापूर शेत शिवारात नुकतेच विद्युत प्रवाहाने पट्टेदार वाघाच्या मृत्युने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जंगल क्षेत्रालगत शेतशिवार असल्याने उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून होणे नित्याची बाब बनली आहे. पिकाचे नुकसान वन्यप्राण्यांकडून होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून वनविभागाला करण्यात आल्या होत्या. मात्र वनविभागाकडून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होते. पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतो. त्यामध्ये कधीकाळी वन्यप्राण्यांचा बळीसुद्धा जात असतो. यामध्ये कोठारी वनपरिक्षेत्रातील कोठारी, करंजी, घोसरी, पोंभूर्णा उपवनक्षेत्रात शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनेत अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेला आहे. वन्यप्राण्यांवर प्रतिबंध करण्याच्या मागणीकडे वनाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पीक बचावात्मक पाऊल उचलावे लागते. त्यामध्ये वन्यप्राण्याचे बळी जातात. मात्र वनविभागांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे वेळीच लक्ष केंद्रीत करून कर्मचाऱ्यांच्या गस्ती वाढवून वन्य प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांचे पीक व वन्य प्राण्यांचे जीव वाचले असते.मागील महिण्यात कुडेसावली शेतशिवारात धुमाकुळ घालणाऱ्या चार वन्यप्राण्याची शिकार करण्यात आली. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाली. मात्र याकडे वनाधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने सदर प्रकारावर पांघरून पडले.कोठारी वनपरिक्षेत्रातील जंगलात सध्या अवैध वृक्षतोडीला उधान आले आहे. साग वृक्षासारखे मुल्यवान वृक्षांची सऱ्हासपणे अवैध धंदेवाले कटाई करीत आहेत. नयन रम्य उभे जंगल बकाल होत आहे. याकडे वनाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आजपर्यंत याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही व ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्रात अवैद्य धंदे वाढत आहेत. (वार्ताहर) पट्टेदार वाघाचे मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्नकरंजी उपवनक्षेत्रातील धानापूर येथे वाघाचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. त्यानंतर शेतकऱ्याने बचावात्मक पवित्रा घेत शेतातच वाघाला पुरले. या प्रकाराची चर्चा सतत दोन दिवस रंगली. ती कोठारीपर्यंत पोहचली. मात्र सदर प्रकाराबाबत वनकर्मचाऱ्यांना माहिती नव्हती, असे असले तरी वास्तविकता निराळीच आहे. वाघाच्या मृत्यूनंतर उधाण आलेली चर्चा स्थानिक वनकर्मचाऱ्यापर्यंत त्याच रात्री पोहचली,मात्र सदर प्रकार दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच व हत्या करणारा शेतकरी स्वत: वनविभागात दाखल झाल्याने प्रकरण अंगलट येवू नये, म्हणून सदर प्रकाराच उलगडा झाला नाही. अन्यथा हे प्रकरण दाबण्यात आले असते. अशी चर्चा या परिसरात मोठ्या जोरात सुरु आहे. परंतु आम्ही घटनेचा शोध लावला असता, असे वनकर्मचारी सांगत आहेत.