शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 25, 2015 01:31 IST

गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो.

कोठारी: गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. त्यासाठी गावकरी मतदानाचा हक्क बजावून कर्तुत्ववान पदाधिकाऱ्यांची निवड करुन आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीत पाठवितात. मात्र निवडून जाणारा प्रतिनिधी नागरिकांच्या समस्या, गावाच्या समस्या व गाव विकास करण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ची दैनंदिन समस्या सोडविण्यात मश्गुल असल्याचे चित्र कोठारी गावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत मोठी मानली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्ड असून १३ सदस्य निवडून पाठविले जातात. पाच हजार मतदार असून गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. चंद्रपूर- आल्लापली या मुख्य मार्गावर गाव वसले असून गावाची सीमा दिवसेंदिवस वाढत आहे. गावाच्या समस्या निकाली काढण्यासाठी पदाधिकारी कार्यरत आहेत. गावात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारे चिखलाने तुडूंब भरलेले आहेत. सांडपाणी गावातील सिमेंट रस्त्यावरुन दिवसरात्र वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त आहेत. नाल्या सफाई करण्यासाठी वेळावेळी पदाधिकाऱ्यांना तक्रारीद्वारे, सांगितले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावात जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. श्रीमतांनी घरोघरी बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था केली. मात्र गोरगरिबांना हातपंपाशिवाय पर्याय नाही. उन्हाळ्यात हातपंपाचे पाणी खोल गेले आहे. पाण्यासाठी महिलांना प्रचंड श्रम करावा लागतो आहे. कोठारीची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिला रात्रंदिवस जागल करीत पाण्याची पूर्तता करीत आहेत. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. सुरु असलेल्या हातपंपावरुन मुबलक पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलांची होणारी होरपळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.गावात वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही केंद्र असून वीज वेळोवेळी खंडित होत असते. सदैव विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त आहेत. त्याकडे कुणी पदाधिकारी जाऊन त्याचा जाब विचारत नाही. वीज कर्मचारी केवळ नामधारी बनून केवळ पगारासाठी उपस्थिती दर्शवित असतात. कधी नव्हे एवढ्या समस्या गावात निर्माण झाल्या असताना त्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष जावू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. यातूनच त्यांचे कार्य नागरिकांना दिसून येत आहे. गावात निर्माण झालेल्या नागरी समस्या पदाधिकाऱ्यांनी निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. मात्र स्वत:च्या हितासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. निवडून जाणारा पदाधिकाऱ्यास जनतेच्या समस्यांचा विसर पडला असून केवळ स्वार्थासाठी ग्रामपंचायतीमध्ये सध्या राजकारण केले जात आहे. (वार्ताहर)