शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 25, 2015 01:31 IST

गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो.

कोठारी: गावातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. त्यासाठी गावकरी मतदानाचा हक्क बजावून कर्तुत्ववान पदाधिकाऱ्यांची निवड करुन आपला हक्काचा प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीत पाठवितात. मात्र निवडून जाणारा प्रतिनिधी नागरिकांच्या समस्या, गावाच्या समस्या व गाव विकास करण्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:ची दैनंदिन समस्या सोडविण्यात मश्गुल असल्याचे चित्र कोठारी गावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत मोठी मानली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्ड असून १३ सदस्य निवडून पाठविले जातात. पाच हजार मतदार असून गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या वर आहे. चंद्रपूर- आल्लापली या मुख्य मार्गावर गाव वसले असून गावाची सीमा दिवसेंदिवस वाढत आहे. गावाच्या समस्या निकाली काढण्यासाठी पदाधिकारी कार्यरत आहेत. गावात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारे चिखलाने तुडूंब भरलेले आहेत. सांडपाणी गावातील सिमेंट रस्त्यावरुन दिवसरात्र वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त आहेत. नाल्या सफाई करण्यासाठी वेळावेळी पदाधिकाऱ्यांना तक्रारीद्वारे, सांगितले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावात जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. हातपंपावर तहान भागवावी लागत आहे. श्रीमतांनी घरोघरी बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था केली. मात्र गोरगरिबांना हातपंपाशिवाय पर्याय नाही. उन्हाळ्यात हातपंपाचे पाणी खोल गेले आहे. पाण्यासाठी महिलांना प्रचंड श्रम करावा लागतो आहे. कोठारीची पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिला रात्रंदिवस जागल करीत पाण्याची पूर्तता करीत आहेत. अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. सुरु असलेल्या हातपंपावरुन मुबलक पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलांची होणारी होरपळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना का दिसत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.गावात वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही केंद्र असून वीज वेळोवेळी खंडित होत असते. सदैव विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त आहेत. त्याकडे कुणी पदाधिकारी जाऊन त्याचा जाब विचारत नाही. वीज कर्मचारी केवळ नामधारी बनून केवळ पगारासाठी उपस्थिती दर्शवित असतात. कधी नव्हे एवढ्या समस्या गावात निर्माण झाल्या असताना त्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष जावू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. यातूनच त्यांचे कार्य नागरिकांना दिसून येत आहे. गावात निर्माण झालेल्या नागरी समस्या पदाधिकाऱ्यांनी निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. मात्र स्वत:च्या हितासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. निवडून जाणारा पदाधिकाऱ्यास जनतेच्या समस्यांचा विसर पडला असून केवळ स्वार्थासाठी ग्रामपंचायतीमध्ये सध्या राजकारण केले जात आहे. (वार्ताहर)