शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 24, 2015 00:44 IST

भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

माजरी : भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र थातूरमातूर कामे करून नागरिकांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भद्रावती तालुक्यातील पळसगाव (माजरी) येथील पाणी पुरवठा करणाऱ्या गावातील नळयोजनेच्या व्हॉल लगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र ती घाण स्वच्छ करण्याचे सौजन्य अद्यापही दाखविण्यात आले नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या व्हाल्व भोवती मोठ्या प्रमाणावर खतांचे ढिगारे आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत आहे. योग्य ठिकाणी व्हॉल असताना ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीचा ठराव न घेता व्हॉल्वची जागा बदलविण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.या पाईप लाईनचे व्हॉल्व योग्य ठिकाणी बसवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. व्हाल्व लगत व वॉलच्या टाक्यातील घाण स्वच्छ करण्यात यावी, अशी विनंती जीवन रोडे, ग्रा.प. सदस्य अनिता रोडे, मनोरमा बंडू बंड, दीपक डाहुले, अनिल बंड, संदीप आंबेकर, सुखेदव पा. बंड, मंगला मन्ने यांसह इतर ४१ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी ग्रामपंचायत सरपंच व सचिव, सभापती पंचायत समिती भद्रावती, सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आल्यात. (वार्ताहर) गावात अनेक समस्यापळसगाव (माजरी) या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिलीत, मात्र त्या निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावकरी आंदोनाच्या पवित्र्यातअनेकदा निवेदने देऊनही समस्या सुटल्या जात नसल्याने गावकरी वैतागले आहेत. दरवर्षी या गावाला घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. मात्र गावातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. सध्या गावकरी दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत आहेत. येत्या १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास गावकरी आंदोलन करणार आहेत.