शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 24, 2015 00:44 IST

भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

माजरी : भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र थातूरमातूर कामे करून नागरिकांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भद्रावती तालुक्यातील पळसगाव (माजरी) येथील पाणी पुरवठा करणाऱ्या गावातील नळयोजनेच्या व्हॉल लगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र ती घाण स्वच्छ करण्याचे सौजन्य अद्यापही दाखविण्यात आले नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या व्हाल्व भोवती मोठ्या प्रमाणावर खतांचे ढिगारे आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत आहे. योग्य ठिकाणी व्हॉल असताना ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीचा ठराव न घेता व्हॉल्वची जागा बदलविण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.या पाईप लाईनचे व्हॉल्व योग्य ठिकाणी बसवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. व्हाल्व लगत व वॉलच्या टाक्यातील घाण स्वच्छ करण्यात यावी, अशी विनंती जीवन रोडे, ग्रा.प. सदस्य अनिता रोडे, मनोरमा बंडू बंड, दीपक डाहुले, अनिल बंड, संदीप आंबेकर, सुखेदव पा. बंड, मंगला मन्ने यांसह इतर ४१ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी ग्रामपंचायत सरपंच व सचिव, सभापती पंचायत समिती भद्रावती, सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आल्यात. (वार्ताहर) गावात अनेक समस्यापळसगाव (माजरी) या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिलीत, मात्र त्या निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावकरी आंदोनाच्या पवित्र्यातअनेकदा निवेदने देऊनही समस्या सुटल्या जात नसल्याने गावकरी वैतागले आहेत. दरवर्षी या गावाला घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. मात्र गावातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. सध्या गावकरी दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत आहेत. येत्या १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास गावकरी आंदोलन करणार आहेत.