शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 20, 2014 23:09 IST

बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.

चंद्रपूर : बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. शहरात प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र, या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी विळखा घातला आहे.बसस्थानकावरुन नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहत उभे राहतात. मात्र, या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होत आहे. बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवीत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे. त्यामुळे थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जाऊन गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे-मोठे अपघातही घडतात. एसटीच्या थांब्याजवळच वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. हा सर्व प्रकार ते उघड्या डोळ्याने बघतात. त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरुंद पडतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)