शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 20, 2014 23:09 IST

बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे.

चंद्रपूर : बल्लारशहा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. याकडे मात्र, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. शहरात प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. स्थानिक जयस्तंभ चौकातील बसस्थानकावरही मोठी गर्दी असते. मात्र, या बसस्थानकाला अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी विळखा घातला आहे.बसस्थानकावरुन नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा आदी मार्गाच्या बसगाड्या धावत असतात. मात्र या बसस्थानकाभोवती काळी-पिवळी तसेच आॅटो चालकांनी विळखा घातल्याने जागेअभावी एसटी चालकांना आपले थांबे बदलावे लागत आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. प्रवासी जेथे बसगाड्या थांबतात तेथे बसची वाट पाहत उभे राहतात. मात्र, या अवैध वाहनांच्या विळख्याने एसटी बसच्या चालकांची गोची होत आहे. बस थांबे सोडून आपले वाहन दुसऱ्या ठिकाणी थांबवीत असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे. त्यामुळे थांब्यावर उभे असलेले प्रवासी धावत जाऊन गाडीत बसतात. या प्रकारामुळे दररोज छोटे-मोठे अपघातही घडतात. एसटीच्या थांब्याजवळच वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. हा सर्व प्रकार ते उघड्या डोळ्याने बघतात. त्यामुळे या अवैध वाहतूक करणाऱ्यांना एक प्रकारचे अभयच मिळत आहे. बसथांब्याच्या जागेवर काळी-पिवळी, आॅटोरिक्षा, सायकल रिक्षा तसेच फळांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अडवला जातो व तो अरुंद पडतो. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)