शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

लस घेणार नसेल तर रेशनचे धान्य व दाखले मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

संजय अगडे तळोधी बा.(चंद्रपूर) : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जगभरात १८ कोटींच्या वर लोक बाधित झाले. लाखो लोकांना आपला ...

संजय अगडे

तळोधी बा.(चंद्रपूर) : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जगभरात १८ कोटींच्या वर लोक बाधित झाले. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूला रोखण्यासाठी सरकारच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत; मात्र ग्रामीण भागातील जनता अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे. या पार्श्वभूमीवर नागभीड तालुक्यातील पळसगाव खुर्द ग्रामपंचायतीने ठराव घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन व ग्रामपंचायतीच्यावतीने दिले जाणारे दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, अशा आशयाचे पत्रकच काढले आहे.

शासनाने कोविड विषाणूजन्य आजाराचा सामना करण्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस वयाच्या १८ ते वृद्धापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. एक डोस लस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या विविध प्रकारावर व्हॅक्सीन लस पूर्णताः परिणामकारक ठरते आहे; मात्र नागभीड तालुक्यात येत असलेल्या पळसगाव खुर्द येथील नागरिकांना लस घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले असता, फक्त ३० ते ३५ लोकांनीच लस घेतली. व्हॅक्सिनपासून धोका होऊ शकतो, गैरसमज झाल्याने काही नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत. अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. आपल्या गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी पळसगाव खुर्दचे सरपंच बालु सिद्धमशेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन धान्य व ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार नाहीत, असा ठराव पारित केला. हा ठराव उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी, नागभीड तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पाठविला आहे.