शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

लस घेणार नसेल तर रेशनचे धान्य व दाखले मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

संजय अगडे तळोधी बा.(चंद्रपूर) : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जगभरात १८ कोटींच्या वर लोक बाधित झाले. लाखो लोकांना आपला ...

संजय अगडे

तळोधी बा.(चंद्रपूर) : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जगभरात १८ कोटींच्या वर लोक बाधित झाले. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूला रोखण्यासाठी सरकारच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत; मात्र ग्रामीण भागातील जनता अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे. या पार्श्वभूमीवर नागभीड तालुक्यातील पळसगाव खुर्द ग्रामपंचायतीने ठराव घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन व ग्रामपंचायतीच्यावतीने दिले जाणारे दाखले न देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, अशा आशयाचे पत्रकच काढले आहे.

शासनाने कोविड विषाणूजन्य आजाराचा सामना करण्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस वयाच्या १८ ते वृद्धापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. एक डोस लस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या विविध प्रकारावर व्हॅक्सीन लस पूर्णताः परिणामकारक ठरते आहे; मात्र नागभीड तालुक्यात येत असलेल्या पळसगाव खुर्द येथील नागरिकांना लस घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले असता, फक्त ३० ते ३५ लोकांनीच लस घेतली. व्हॅक्सिनपासून धोका होऊ शकतो, गैरसमज झाल्याने काही नागरिक लस घेण्यास नकार देत आहेत. अजूनही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. आपल्या गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी पळसगाव खुर्दचे सरपंच बालु सिद्धमशेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन लस न घेणाऱ्या कुटुंबाला रेशन धान्य व ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार नाहीत, असा ठराव पारित केला. हा ठराव उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी, नागभीड तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पाठविला आहे.