शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सुजान नेतृत्व नसेल तर समाज भरकटतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:59 IST

दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले.

ठळक मुद्देसुधाकर गायकवाड : बॅरि. राजाभाऊ खोबरागडे जीवनग्रंथाचे प्रकाशन

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले. समाजाचा विकास केला. बॅरि. खोबरागडे यांनी बाबासाहेबांचाच विचार पुढे नेला. त्यामुळे नव्या पिढीने त्यांचा संघर्षदायी जीवनप्रवास समजून घ्यावा, असे प्रतिपादन मुंबई येथील साहित्यिक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले. डॉ. इसादास भडके लिखित ‘बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे आंबेडकरी चळवळ आणि विचार’ या ग्रंथाचे लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशन व आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. अशोक गोडघाटे तर मंचावर भीमराव वैद्य, बॅ. राजाभाऊ खोबरागडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा. गौतमी डोंगरे- खोबरागडे, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर, सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभुरकर, कवी लोकनाथ यशवंत, डॉ. इसादास भडके उपस्थित होते.डॉ. भडके यांचा हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीचा ज्ञानग्रंथ आहे, असे निरीक्षण प्रा. डोंगरे यांनी नोंदविले.भीमराव वैद्य व लोकनाथ यशवंत यांनी ग्रंथाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. प्रा. अशोक गोडघाटे यांनी समग्र आंबेडकरी चळवळीचा आढावा घेवून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या निगर्वी व तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. भडके यांनी मनोगत व्यक्त केले. लोकार्पण सोहळा आंबेडकरी चळवळीतील सेनानी गिरीश खोबरागडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आला. यावेळी प्रा. एस. टी. चिकटे व प्रसिद्ध विचारवंत प्रा. जेमिनी कडू यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.संचालन शुद्धोधन मेश्राम, प्रास्ताविक डॉ. मेघमाला मेश्राम यांनी केले. अस्मिता भडके यांनी आभार मानले. यावेळी विचारवंत ताराचंद्र खांडेकर, मारोतराव खोबरागडे, पी. व्ही. मेश्राम, अ‍ॅड. बोरकर, अंकुश वाघमारे, त्रिलोक शेंडे इ.मो. नारनवरे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड, डॉ. पी. डी. निमसटकार, नागेश सुखदेवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.