शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:53 IST

देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी नाकारली जाते. शेतकºयांच्या पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. देशात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही. कसत असलेल्या वनजमिनी जबरानजोत धारकांच्या नावाने केल्या जात नाही. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा मोर्चाब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर धडकला.महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात संघर्ष यात्रा काढली आहे. विदर्भात ७ सप्टेंबरपासून पारशिवनी नागपूर पासून या यात्रेला सुरूवात झाली असून १३ सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी शहरात यात्रा पोहचताच हजारो शेतकरी, शेतमजूरांनी हातात झेंडे घेऊन शिवाजी चौकात दुपारी ३.०० वाजता यात्रेचे स्वागत केले.तत्पुर्वी महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व जबरानजोत धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन किसान नेते विनोद झोडगे, नामदेव नखाते, श्रीधर वाढई, देवराव खानखुरे, कुंदा कोहपरे, बाळकृष्ण दुमाने, सुधीर खेवले, मनोहर आदे, श्रीराम हजारे, दिवाकर झाडे, मिलींद मेश्राम, राजू मोटघरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी शेतमजूरांनी दुपारी २.०० वाजता हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढला.सरकार विरूध्द घोषणाबाजी करत व हातात लाल झेंडे घेऊन ब्रह्मपुरी एस.डी.ओ. कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ काळे, तहसिलदार चव्हान यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले व मागण्यांविषयी चर्चा केली. यामध्ये शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, सर्व जबरानजोत धारकांना जमिनीचे पट्टे व घराचे पट्टे द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.