शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वन संपन्न असेल तर धन संपदा येईल

By admin | Updated: December 26, 2016 01:17 IST

एकविसाव्या शतकात सर्वात महत्त्वाचे कोणते दान असेल तर ते रक्तदान व आक्सिजन दान आहे

सुधीर मुनगंटीवार : वन वसतिगृह व विश्रामगृहाचे लोकार्पण चंद्रपूर : एकविसाव्या शतकात सर्वात महत्त्वाचे कोणते दान असेल तर ते रक्तदान व आक्सिजन दान आहे. मनुष्य रक्तदान करू शकतो. आक्सिजन दान करायचे असेल तर वृक्ष लावले पाहिजे. वृक्ष संपदेतूनच धन संपदा येऊ शकते, त्यामुळे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मिशन म्हणून हाती घेतला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रामबाग येथे वन विभागाच्या वन वसतिगृह व वन विश्रामगृहाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक आर.टी.धाबेकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाच्या नया विश्रामगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह व त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सदर इमारत उभी राहत आहे. या विश्रामगृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या सोई व त्यांच्या मुलांना सुध्दा चांगली सुविधा मिळेल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन, कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता, गणवेश भत्ता समस्या सोडविण्यासोबतच चांगल्या दर्जाची निवासस्थाने बांधून देण्याचे नियोजन केले जात आहे. वनांच्या संवर्धनात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. गेल्यावर्षी आपण २ कोटी ८३ लाख वृक्षांची लागवड केली. यावर्षी तीन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. त्यासाठी अत्याधुनिक नर्सरीही तयार केली जात असल्याचे, ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. सुरूवातीस वन वसतिगृह व वन विश्रामगृहाच्या नामफलकाचे अनावरण तसेच फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नवनिर्मित इमारतीची पाहणीही केली. (स्थानिक प्रतिनिधी) चिचपल्ली येथे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून देशातील सर्वात सुंदर प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. नाशिक येथे देशातील पहिले वन विभागाचे काल सेंटरचे लवकरच उद्घाटन होणार आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील प्रत्येक कुटूंबास गॅसचे वितरण केले जात आहे. वन विभागाच्या या सर्व कार्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. वनविद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न गोंडवाना विद्यापीठाचा एकात्मिक आराखडा आपण करतो आहे. देशातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात असून त्यासाठी चंद्रपूर चांगले ठिकाण आहे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मोहफुले मोठ्या प्रमाणावर आहे. या फुलांपासून दोनशे कोटी रूपयांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते. मोहफुले हे सेफ या फळापेक्षाही नऊ पट अधिक पोषक आहे. त्यामुळे या फुलांकडे महसूल व जीवनसत्वाच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.