शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

बसेस सुरु न केल्यास आंदोलन

By admin | Updated: July 14, 2014 01:57 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर

विद्यार्थ्यांचा इशारा : महामंडळाचे नियोजनच नाहीगडचांदूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना बसची समस्या भेडसावू लागली आहे. एकही बस वेळेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळा शिकावायची कशी अशा विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे. गडचांदूर बसस्थानकावर ११.३० ला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना ४ ते ५ वाजेपर्यंत उपाशीपोटी बसची वाट पाहत उभे राहावे लागते. येत्या दोन दिवसात बसचे नियोजन करुन बसेस उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.गडचांदूर आगाराकाडे बसेस उपलब्ध असताना नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरवर्षी ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आगार प्रमुखांकडे निवेदने द्यावी लागतात ही शोकांतिका आहे. नांदा, बिबी, कोरपना, लोणी, अंतरगाव, सांगोडा, गाडेगाव, वनसडी, नारंडा, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामगाव, बाखर्डी, कवठाळा, निमणी, आवारपूर इत्यादी गावातील विद्यार्थी सकाळ व दुपार पाळीत गडचांदूर येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. वेळेच्या अगोदर किंवा नंतर अर्ध्या- एक तासाच्या अंतरावर बसेस सुटून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शासन विद्यार्थ्यांसाठी बालकांना मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम तयार करुन लागू करीत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहे. मग शासनाचा नियम लागू कसा होणार असा सवालही विद्यार्थी करीत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, गाडेगाव, व भोयगाव व राजुरा येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटानी बस सुटल्यास ७ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस १२ वाजता सुटल्यास सर्वविद्यार्थ्यांना सोयीचे होते.विद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, भोयगाव व राजुरा येथून सकाळी १० वाजून ४५ मिनिटानी व पालगाव- नांदाफाटा येथून ११ वाजता बस सुटल्यास ११.१५ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस ५.३० वाजता सुटल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे होते. यासाठी आगाराला नवीन बसेस सुरु करण्याची गरज नसून बसेस उपलब्ध आहे. फक्य नियोजन करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)पालगाव बसचा थांबाबिबी येथे द्यावापालगाव बस नांदाफाटा येथून सुटतात. नांदाफाटा ते गडचांदूरच्या मध्यभागी फक्त बिबी येथे एकच थांबा असतो. येथून रोज २० ते ३० विद्यार्थी गडचांदूर येथे श्क्षिणासाठी जातात. मात्र नागपूर, साकोली आगाराच्या जलद बस असल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना वाकुल्या दाखवत निघून जातात. त्यामुळे या बसचा थांबा बिबी येथे देण्यात यावा.मानवविकास मिशनचे काय?राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा व जिवती या तालुक्याचा मानव विकास मिशनमध्ये समावेश झाल्याने मुलींना १२ वीपर्यंत बस पास मोफत असतात. मात्र राजुरा तालुक्यातील गावातून कोरपना तालुक्यातील गावापर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपास मोफत मिळत नाही. त्यामुळे राजुरा आगाराने नेमकी योजना कशी आहे. याबद्दल विद्यार्थीनींना माहिती देऊन निदान राजुरा तालुक्यातील चंदनवाही, हरदोना (खु.), हरदोना (बु.) या गावातील विद्यार्थीनींना गडचांदूरपर्यंत येण्यासाठी मोफत बसपास योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. कारण ही गावे राजुरा तालुक्यात येतात आणि राजुरा तालुक्याचा समावेश मानव विकास मिशनमध्ये झाला आहे. थांबा असणाऱ्या बसेस द्याराजुरा, कोरपना, भोयगाव व पालगाव याठिकाणाहून येणाऱ्या सर्व बसेस प्रत्येक गावात थांबा असणाऱ्या असाव्या, कारण अनेक बसेस खाली असतात. मात्र थांबा नसल्याने रस्त्यावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. त्यामुळे थांबा असणाऱ्याच बसेस देण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.